Bhagat Singh Koshyari-Sharad Pawar
Bhagat Singh Koshyari-Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Pawar On Koshyari Resign : ‘महाराष्ट्राची सुटका झाली...’ : कोश्यारींच्या राजीनाम्यावर शरद पवारांचे भाष्य

Vijaykumar Dudhale

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा (resign) मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘महाराष्ट्राची (Maharashtra) सुटका झाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी कोश्यारी यांचा राजीनाम्यावर भाष्य केले आहे. (Sharad Pawar's reaction on Bhagat Singh Koshyari's resignation)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मंजूर केला. कोश्यारी यांच्या जागी झारखंडचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यावर भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले की, माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली आहे. कोश्यारी यांच्या राजीनाम्याचा अतिशय चांगला निर्णय याआधीच घ्यायला पाहिजे होता. पण तो आता घेतला गेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती आपण पाहिली. पण, केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांनी त्यामध्ये बदल केला आहे. ही अतिशय समाधानकारक बाब आहे.

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे काही असंविधानिक निर्णय घेतले असतील तर त्या सर्व निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही शरद पवार यांनी या वेळी बोलताना केली. दरम्यान, याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विनंती मान्य झाल्यामुळे राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT