Vinod Tawde
Vinod Tawde Sarkarnama
विदर्भ

Vinod Tawde News : विनोद तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार...? थेट मुख्यमंत्री पदाबाबत केलं सूचक विधान

Deepak Kulkarni

Nagpur News : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून वारंवार मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा झडत असतात. कधी महाविकास आघाडीचे नेतेमंडळींचे दावे तर कधी सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर त्याला कारणीभूत ठरतात. या यादीत अजित पवारांपासून ते नाना पटोलेपर्यंत बऱ्याच नेत्यांचा समावेश आहे. पण आता याच यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील वजनदार नेते विनोद तावडेंनी सूचक वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.

विनोद तावडे (Vinod Tawde) यांचं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आले होते. यानंतर पक्षनेतृत्वाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात एकापाठोपाठ नव्या जबाबदारी देत त्यांचे पुनर्वसनही केले. या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्या. यामुळे तावडेंनी पक्षनेतृत्वाची मर्जी प्राप्त केली. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थानच्या निवडणुकीत त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने मोठी जबाबदारी सोपवली होती. यानंतर विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री ठरवण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

विनोद तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार असल्याच्या चर्चाही सुरू आहे. पण त्यांनी स्वत:या चर्चांकडे तितक्या गांभीर्याने पाहिले नव्हते.पण आता तावडेंनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेतृत्व महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण पंकजा मुंडे (Pankaja Munde) राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतील का असा प्रश्न विचारल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रतिप्रश्न विचारत मी मुख्यमंत्री व्हावं असं वाटत नाही का असं वक्तव्य केलं.

"...तर राष्ट्रवादीला सोबत घेतले नसते!"

भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर भाष्य केले.उद्धव ठाकरेंनी भाजप(BJP)सोबत गद्दारी केली नसती तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले नसते,असा दावा त्यांनी केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुती 48 पैकी 45 जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

" काँग्रेसच्या हेकेखोरपणामुळे आघाडीत फूट..."

तीन राज्यात जे घडले ते पाहून अनेकांना असे वाटू शकते की प्रस्थापितांच्या जागी नवीन लोक का निवडले गेले. मात्र त्यामागे पक्षाचा विचार असा आहे, पक्षाने जे कामं दिली ती कामं करायची. मला ही स्पष्टता आधीच होती. इतरांना मात्र आता घडलेल्या प्रकारातून ती स्पष्टता आली असावी.इंडिया आघातील मित्रपक्ष हे आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा विचारात आहेत. काँग्रेसच्या हेकेखोरपणामुळे आघाडीत फूट पडल्याचा दावा विनोद तावडे यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT