Aaditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray On ECI : इच्छा असूनही आम्ही काही करू शकत नाही; आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीच्या राज्यात पाचव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघासह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे येथे मतदान पार पडत आहे. यावेळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटुंबासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अनेक मतदान केंद्रावर असुविधा अढळून आल्याने माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी याकडे लक्ष देण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली.

आदित्य ठाकरेंनी मतदान केंद्रावरील असुविधांचा पाढाच एका व्हिडिओच्या माध्यमातून वाचला आहे. तसेच मतदान केंद्रावर सुविधा देण्याची आमची इच्छा आहे. मात्र आचारसंहितेचे नियमानुसार ते आम्ही देऊ शकत नाही. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची Election Commission असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत मतदान केंद्रातील स्थितीकडे लक्ष देण्याची विनंती आयोगाला केली आहे.

आदित्य ठाकरे Aaditya Thackeray म्हणाले, आज मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी मुंबईकर केंद्रावर सकाळी सातपासून रांगेत उभे आहेत. मात्र अनेक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध नाहीत. सावलीची सोय नसल्याने मतदारांना उन्हातच तासनतास उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्रास होऊन अनेकांना चक्कर आलेली आहे. तेथे पाण्याची सोय नाही. कुठेही पंखे लावलेले नाहीत. ही जबाबदारी पूर्णपणे निवडणूक आयोगाची होती. इच्छा असूनही आम्ही तिथे काहीच करू शकत नाही, अशी खंतही आदित्य यांनी यावेळी व्यक्त केली.

मतदान करताना मोबाईल न्यायचा नाही, असे सांगितले जात होते. मात्र अनेक बुथवर घड्याळ, मोबाईल सोबत ठेवायचा की नाही ठेवायचा? याबाबत मतदारांत संभ्रम आहे. हे सगळे गोंधळ आता शेवटच्या मिनिटाला समोर येत आहेत. आता मतदान होण्यासाठी फक्त काही तास उरले आहे. उन्हापासून संरक्षण करून मुंबईकरांना मतदान करता यावे यासाठी आपण मदत करावी, अशी विनंती ठाकरेंनी आयोगाला केली आहे. मतदान केंद्रावरील सुविधांसाठी आम्ही काही प्रयत्न केले तर आमच्यावर केस होईल, असेही आदित्या ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकशाहीत मतदानाला महत्त्व असते. त्यामुळे अनेक दिवसांपासून आम्हीच मुंबईकरांना Mumbai मतदान करण्याचे आवाहन करत आहोत. तसेच आयोगानाहे अभिनेत्यांच्या माध्यमातून मतदानासाठी प्राचर, प्रसार केला. प्रत्यक्षात मात्र मतदान खूप कमी होताना दिसत आहे. यंदा मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे समोर येत आहे, याकडेही आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT