Mumbai, 04 January : महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन महिने होत आले आहेत. मात्र, अजूनही सत्तेचा वाटप होऊ शकलेले नाही. राजकीय दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या पालकमंत्रिपदाच्या निवडीवर अद्याप महायुती सरकारला तोडगा काढता आलेला नाही. राज्यातील काही महत्वाच्या जिल्ह्यांसाठी तीनही पक्षांचा आग्रह असल्याचे दिसून येत आहे. त्यातही बीड, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, मुंबई शहर या महत्वाच्या पालकमंत्रिपदासाठी तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे.
राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठे बहुमत मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत केवळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला होता. त्यानंतर कोणाला किती मंत्रिपदे यावरून महायुतीमध्ये खल सुरू होता. त्यावर एकमत झाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा शपथविधी होऊन मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खरा पण मंत्रिपदाचे वाटप न झाल्याने हिवाळी अधिवेशनात मुख्यमंती देवेंद्र फडणवीस यांनी एकट्यानीच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. बहुचर्चेनंतर अखेर हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर खाते वाटप जाहीर झाले. मात्र, पालकमंत्रिपदाचा (Guardian Minister) तिढा अद्याप कायम आहे. महायुतीमध्ये आठ ते दहा जिल्हे असे आहेत की ते कोणाकडे जाणार हे अद्याप ठरू शकलेले नाही.
महायुतीकडून पालकमंत्रिपद वाटपाचे सुमारे ८० टक्के काम झालेले आहे. पण, काही जिल्ह्यांवर अद्याप महायुतीमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. राज्याच्या राजकारणात महत्वाचे ठरणारे जिल्हे आपल्याच ताब्यात राहावेत, यासाठी महायुतीमधील तीन पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. त्यात पुणे, मुंबई शहर, कोल्हापूर, सातारा, रायगड, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई शहर, साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. तसेच, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यात रस्सीखेच दिसून येत आहे. तसेच, संतोष देशमुख खून प्रकरणावरून गाजत असलेले बीडचे पालकमंत्रिपदही कोणाकडे जाणार याची उत्सुकता कायम आहे.
दुसरीकडे, रायगड, कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा आहे. रायगडसाठी राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांची कन्या राज्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यात चढाओढ दिसून येत आहे. आता हे जिल्हे कोणाकडे जाणार, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.