Amruta Fadnavis - Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Amruta Fadnavis News : देवेंद्र फडणवीसांविषयी अमृता फडणवीसांचं महत्वाचं विधान; म्हणाल्या, '' हे मला लग्न झाल्यापासून...''

सरकारनामा ब्यूरो

Pune : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. राज्याच्या राजकारणातील अजित पवारांसारखा बडा नेता राष्ट्रवादीतील आमदारांचा मोठा गट घेऊन भाजपप्रणित महायुती सरकारमध्ये सहभागी झाला आहे. पण या शिवसेना- राष्ट्रवादी फुटण्यामागे देवेद्र फडणवीसच मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून ते महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. आता त्यांच्याविषयी अमृता फडणवीसांनी मोठं विधान केले आहे. पदवी आताच दिली पण मला लग्न झाल्यापासून माहिती आहे की, ते डॉक्टर आहेत असे त्या म्हणाल्या.

अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांविषयी कौतुकोद्गार काढले. त्या म्हणाल्या, आत्ता फक्त त्यांना 'रेकग्नाइझ' केले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यापासून डॉक्टर आहेत.ते पॉलिटिकल डॉक्टर आहेत. आणि हे मला लग्न झाल्यापासून माहिती आहे असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

''...त्यासाठी मी उपस्थित असेल!''

अखिल भारतीय जैन महासंघाने आरोग्य शिबिराचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरु केला. त्यात अनेक शिबिरे झाली. आता दुसरा टप्पा सुरु होतोय. या उपक्रमात ५० हजार लोकांना सामील करून घ्या. कॅन्सरमुक्त होण्यासाठी कशी जीवनशैली असावी, यावर लोकांना माहिती द्यावी. यामध्ये तन- मन - धन अशा कुठल्याही प्रकारे मदत लागली, तर मी तत्पर असेल. माझा चेहरा तुम्ही घ्या( ब्रॅन्ड अम्बेसिडर ) आपल्याला महाराष्ट्र कॅन्सरमुक्त करायचा आहे. त्यासाठी लागेल तिथे मी उपस्थित असेल असेही त्यांनी सांगितले.

...अन् देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला निर्णय !

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा उत्पादकांना रोष कमी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडें(Dhananjay Munde) नी तातडीने दिल्ली गाठली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याबरोबर मुंडे यांची बैठक सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार २४१० रुपये दरांनी दोन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.

दरम्यान, कांदा प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे प्रयत्न करत असतानाच भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचा निर्णय जाहीर करून त्याचे श्रेय घेतल्याची चर्चा राज्यात सुरू झाली होती. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे आणि पवार यांनी स्पष्टीकरण दिले.

(Edited By Deepak Kullkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT