Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : 'टाटा'नंतर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर, ठाकरेंचा सरकारवर निशाणा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. काल त्यांनी घटनाबाह्य सरकार म्हणून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती.‘सॅफ्रन’हा प्रकल्प देखील आता राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारला पुन्हा घेरले आहे.

या खोके सरकारवरून महत्त्वपूपर्ण क्षेत्रांचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. उद्योग (Industry) आणि शेती क्षेत्राचा सरकारवरचा विश्वास उडालेला आहे. महाराष्ट्रातील एक एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. ठाकरे गटांच्या या बॅनरवर महाराष्ट्राबाहेर गेलेल्या सर्व प्रकल्पांची यादी देण्यात आली. यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील तणाव वाढण्याचे चिन्हे दिसून येत होती.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

‘सॅफ्रन’हा ही प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला. याबद्दलच आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट केलं आहे. ‘महत्त्वाच्या दोन क्षेत्रांचा या घटनाबाह्य आणि खोके सरकारवरुन पूर्णपणे विश्वास उडालेला आहे, ते म्हणजे, उद्योग आणि शेती.

मोठ्या गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रातील राजकीय स्थौर्याबाबत विश्वास उडालेला आहे. तर परतीच्या पावसातील संकटातील शेतकऱ्यांचाही सरकारचा विश्वास उडालेला आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा + प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास = महाराष्ट्राचे नुकसान,' असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT