Mhatre and Kapil patil Sarakarnama
मुंबई

Suresh Mhatre Vs Kapil Patil : 'स्वार्थासाठी ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाला खाईत लोटतील'; सुरेश म्हात्रेंचा कपिल पाटलांवर निशाणा!

Pankaj Rodekar

Loksabha Election 2024 : 'भिवंडी लोकसभेची अवस्था सर्व दृष्टीने बिकट झाली आहे, इथे मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे, स्वत:च्या स्वार्थासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाला खाईत लोटले जाईल,' असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केला आहे.

याचदरम्यान त्यांनी आजच सगळ्या मतदारांना जागे व्हा, असे आवाहन मी करेन असेही त्यांनी म्हटले. सुरेश म्हात्रे यांनी सोमवारी शरद पवार(Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट ठाण्यातील नाद बंगल्यावर जाऊन घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर आरोप केला. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या नेतेमंडळींच्या तीन जाहीर सभा होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याशिवाय, गोदामावर जी कारवाई झाली, ती शंभर टक्के चुकीची आहे. उच्च न्यायालयाची स्टे ऑर्डर असतानादेखील कारवाई झाली आहे. त्या विरोधात मी कोर्टात गेलो आहे. दोन ते तीन दिवसात त्या संदर्भातील निर्णय येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच तीन दिवसांपूर्वीदेखील एक रस्ता तोडला, सीसी असूनदेखील वन खात्याकडून कारवाई केली गेली. अधिकाऱ्यांवरदेखील दबाव असल्याचे ते म्हणाले.

तर यावेळी म्हात्रे यांनी 'कपिल पाटील(Kapil Patil) यांनी भिवंडीत केवळ टक्केवारीचे राजकारण केले असून, एवढ्या वर्षांत त्यांनी येथील लोकांसाठी काय केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच पाटील हे निष्क्रीय आणि अपयशी खासदार असून, त्यांच्यावर जनता 100 टक्के नाराज आहे. त्यांनी भिवंडीत एक तरी प्रोजेक्ट आणला का, ज्याने येथे रोजगारनिर्मिती होईल? आणि त्यांचा व्यवसाय नसेल तर त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? असे प्रश्नही उपस्थित केले.

तसेच ते खासदार असूनही त्यांच्या घरासमोरील रस्ता झाला नाही. भिवंडीतील युवकांना रोजगार नाही, ते नशेचा आहारी जात आहेत, असंही सांगत याबाबत माहिती घ्यावी आणि हे कोण करत आहे ते पाहवे, असे म्हात्रे म्हणाले. तर नीलेश सांबरे यांनी लढण्याचे संकेत दिले आहेत, असं म्हटल्यानंतर त्यांनी अजून त्यांनी फॉर्म भरलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीत सर्वांना एकत्र होणे गरजेचे असल्याचे सांगत ही एकाच विचारांची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

भिवंडी मतदारसंघात होणार तीन सभा -

भिवंडी लोकसभेत इंडिया आघाडीच्या तीन सभा होणार आहेत. यामध्ये शरद पवार, उध्दव ठाकरे आदी इंडिया आघाडीचे नेते हजेरी लावणार आहेत. प्रामुख्याने या सभा भिवंडी, कल्याण पश्चिम आणि शहापूर या ठिकाणी होणार असल्याचेही सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.

धमक्या देऊन निवडणूक जिंकता येत नाही- आव्हाड

पूर्ण गोडाउनचा नेता कोण आहे. कपिल पाटील हे गोदामसम्राट आहेत. असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी करत धमक्या देऊन निवडणूक जिंकता येत नाही, नाहीतर भारतातले सगळे डॉन आमदार आणि खासदार झाले असते. असा टोला त्यांनी यावेळी कपिल पाटील यांना लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT