Abdul Sattar
Abdul Sattar  Sarkarnama
मुंबई

Abdul Sattar : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवरच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत मोठी घोषणा केली. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31 मे पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असं सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

''31 मे पर्यंत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील. यामध्ये नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत'', असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रूपये नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे, असंही यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT