Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : सलमाननंतर जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगचे टार्गेट, लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी

Roshan More

Mumbai News : नुकताच सिनेअभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराची जबाबदारी सोशल मीडियावर पोस्ट टाकून बिष्णोई गँगने पोस्ट टाकून घेतली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटकदेखील केली आहे. मात्र, आता बिष्णोई गँगच्या नावाने थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करत लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना खंडणीसाठी ऑस्ट्रोलियावरून फोन आला होता. रोहित गोदरा असे खंडणी मागणाऱ्याचे नाव असल्याचे त्याने सांगितले. पैसे न दिल्यास सलमान खानसारखे होणार असल्याची धमकी आव्हाड यांनी देण्यात आली.

जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस (Police) ठाण्यात धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी साहब गुप्ता, सागर श्रीजोगेंद्र पाल या दोघांना अटक केली आहे. त्यानुसार आव्हाडांना खंडणी मागणाऱ्या सूत्रधारालादेखील पोलिस अटक करतील, अशी आशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

बिष्णोई गँगच्या रडावर नेते?

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर या गँगच्या सदस्यांची हिंमत वाढली आहे. त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना फोन करून खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर तयार राहा, असा इशारा दिला. त्यामुळे आता विष्णोई गँगच्या रडारवर राजकीय नेते असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT