Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal sarkarnama
मुंबई

Video Chhagan Bhujbal : छगन भुजबळ पंतप्रधान मोदींकडे करणार 'ही' मोठी मागणी

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्याला ओबीसी नेत्यांनीही विरोध केला आहे. मराठा समजाला आरक्षण द्यावे, मात्र ओबीसी प्रवर्गाला धक्का लावू नये, असा आग्रह ओबीसींचा आहे.

या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यात जातीय जनगणना करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

जातीनिहाय जनगणनेची मागणी काही दिवसांपासून केली जात आहे. संख्येच्या आधारे सरकारी नोकऱ्यांमध्ये विविध जातीमध्ये आरक्षण देणे आणि गरजू लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यामागचा हेतू आहे. पण भाजपला जातीनिहाय जनगणना केली, तर आपले उच्चवर्णीय मतदार नाराज होतील, अशी भीती आहे. तसेच पारंपरिक हिंदू व्होट बँकही विखुरली जाण्याची शक्यता असल्याने जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जात आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार Nitishkumar यांनी लोकसभा निवडणुकीआधीच जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. त्याचवेळी आता लोकसभा निकालानंतर देशात 'एनडीए' सरकार सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातीनिहाय जनगणनेची मागणी करणार असल्याचे विधान केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

समता परिषदेच्या बैठकीनंतर भुजबळांनी Chhagan Bhujbal प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देता येणार नाही, हे आयोगानेच सांगितले आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोधच राहील. आता जातनिहाय जनगणना केली तर त्या ओबीसींसाठी फायदा होईल. त्यांना मोठा फंड‌ मिळेल, त्यामुळे पंतप्रधान मोदींकडे राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता काही लोक उपोषणाला बसले आहेत. ओबीसींवर अन्याय होतील अशा गोष्टींवर चर्चा करणार आहे. त्यामुळे उपोषणाबाबत कडक भूमिका घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. सरकार अन्याय करत असेल तर मी ओबीसींसोबत असेल, असेही त्यांनी सांगितले.

इच्छा असूनही राज्यसभेत वर्णी लागली नाही, म्हणून भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर त्यांनी नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणाचा बीड, जालना भागात फटका बसला पण विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तेवढा फटका बसला नाही. मी कधी बोललो का नाराज आहे म्हणून. राजकारणात पुढे -मागे होत असते. एक दिवस वेगळा जातो, हे वेगळे काही नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT