मुंबई

Chhagan Bhujbal : शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत नसेल तर बोलता कशाला? भुजबळांनी लोढांना फटकारले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण सद्या विविध राजकीय टिका टिपण्णीने ढवळून निघाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतंच छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशी त्रिवेदी यांनाही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता राज्याचे मंत्री व भाजपचे बडे नेते मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांबद्दल शिवप्रताप दिनी एक विधान केले यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटले आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी म्हंटले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. आता या विधानाचा भुजबळांनी जोरदारपणे समाचार घेतले आहे. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासच माहिती नसेल, तर तुम्ही त्यांची तुलना कशाल करता, आणि बोलताच कशाला? अशा शब्दात भुजबळांनी लोढांना फटकारले आहे.

काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा ?

औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना रोखून ठेवलं होतं, पण शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी रोखलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले," असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य करत केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT