cm Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्र्यांनी तातडीनं बोलावली मंत्रिमंडळ बैठक; ओबीसी आरक्षणावर महत्वाची चर्चा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सोमवारी तातडीने मंत्रिमंडलाची बैठक बोलावल्याचे समजते. मंत्रिमंडळाची बैठक दर आठवड्यात बुधवारी होते. या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत (OBC Reservation) मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतही धोरण निश्चित केलं जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते अद्याप रुग्णालयातच आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते मंत्रिमंडळ व इतर बैठका, कार्यक्रमांना हजेरी लावतात. दर बुधवारी होणारी मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री अचानक सोमवारी दुपारी एक वाजता बोलावली आहे. प्रामुख्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर या बैठकीत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाची मुदत वाढवण्याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यात २१ डिसेंबरला १०५ नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही अट घातली आहे. ही अट शिथील करून एक वर्षाची मुदत देण्याचा निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो.

महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर महिन्यात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत अद्यादेश काढला आहे. आंध्र प्रदेश व तेलंगण राज्याने काढलेल्या अध्यादेशाच्या धर्तीवर हा अध्यादेश आहे. या अध्यादेशामुळे ओबीसी समाजाचे गेलेल राजकीय आरक्षण पुन्हा परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण अध्यादेशामुळे ओबीसींच्या सुमारे 10 टक्के जागा कमी होणार आहेत. अध्यादेशामुळे 90 टक्के जागा वाचणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT