Deepak Kesarkar Sarkarnama
मुंबई

Shivsena Politics : बाळासाहेबांच्या इच्छेविरुद्ध उद्धव यांची 'ती' कृती, त्यामुळेच शिवसेना फुटली; दीपक केसरकरांचा दावा

Eknath Shinde Deepak Kesarkar ShivSena split Sindhudurg Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सिंधुदुर्गमधील नेते दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंमुळे फुटल्याचा आरोप केला आहे.

Pradeep Pendhare

Mmbai News : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची साथ अनेक नेते सोडून चालले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यात 'ऑपरेशन टायगर' सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका ठाकरे यांच्या शिवसेनेला बसत आहे.

यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच, माजी मंत्री आणि सिंधुदुर्गमधील नेते आमदापर दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंमुळे फुटली, असा दावा केला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेविरोधात उद्धव यांनी भूमिका घेतल्याने शिवसेना फुटली असे म्हटले.

आमदार दीपक केसरकर म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती. इतिहास आहे, की मोठा विजय मिळविल्यानंतर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र पक्षप्रमुखाने पक्षप्रमुखाचे काम करायचे असते. ती परंपरा उद्धव ठाकरेंमुळें खंडित झाली.शिवसेनेची स्वार्थासाठी काम न करण्याची जी महती होती, ती कमी झाली".

'बाळासाहेबांची एक इच्छा होती की माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे, ती इच्छा एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली', असे म्हणत दीपक केसरकर यांनी शिंदेंचे कौतुक केले. उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेना काँग्रेसला (Congress) दावणीला बांधल्याचा घणाघात देखील दीपक केसरकर यांनी केला.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला शरद पवारांचा विरोध होता, असा संजय राऊत यांनी दावा केलेला आहे. यावर दीपक केसरकर यांनी राऊत बोलतात ते फारसे गांभीर्याने घेऊ नये, असे म्हटले. बाळासाहेबांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात लढताना गेलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात जेव्हा बोललं गेलं, त्यावेळी बाळासाहेबांनी जोडेमोरो आंदोलन केलं. एका केंद्रीय मंत्र्याला मुंबई देखील बंद करून टाकली. त्याला बाळासाहेब म्हणतात, याची आठवण दीपक केसरकर यांनी करून दिली.

उद्धव ठाकरेंची अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी साथ सोडत आहेत. यावर दीपक केसरकर म्हणाले, "जे लोक बाळासाहेबांच्या विचारासोबत आहेत, ते तिथे राहू शकत नाहीत. तिथे स्वातंत्र्यवीरांचा अपमान होतो. ज्या शक्तीशी बाळासाहेबांनी लढा दिला, त्या अनिष्ट शक्ती पाकिस्तानचा पुरस्कार करतात. अशा इच्छाशक्तींशी हात मिळवणे कोणीही करू नये".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT