Eknath Shinde sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : शिंदे गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढणार?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट विरुद्ध शिवसेना (Shivsena) यांच्यातील खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) झाली. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पाठवलेल्या नोटीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने आमदारांना १२ जुलैपर्यंत वाढीव वेळ दिला आहे.

त्यामुळे आता राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदे गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी १२ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गट राज्यपालांना पत्र देणार आहे. तर दुसरीकडे भाजपच्या कोअर कमिटीची बैठक ५ वाजता होणार आहे. यामुळे राज्यातील राजकारण वेगाने फिरणार आहे.

न्यायालयाने आमदारांना वेळ दिल्यानंतर दरम्यानच्या काळात विधानसभेत कोणतीही बहुमत चाचणी नको, अशी मागणी शिवसेनेच्या वकिलांनी केली होती. मात्र, न्यायालयाने असा कोणताही आदेश दिला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने आपण ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला, असल्याचे पत्र राज्यपालांना दिल्यानंतर ते ठाकरे सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश देऊ शकतात.

राज्यपालांनी असे अधिवेशन बोलावले तर ठाकरे सरकारला बहुमताला सामोरे जावे लागेल. शिंदे गटाकडे शिवसेना तसेच अपक्षांचे ५१ आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारकडे सध्या बहुमत कमी आहे. ठाकरे सरकार अडचणीत आल्याचे सांगितले जात आहे. त्यातच भाजपच्या गोटातही हालचाली सुरु झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT