Eknath Shinde - Manoj Jarange  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : सरकारचा 'जीआर' आला तरी जरांगे पाटलांची माघार नाहीच ; अखेर मुख्यमंत्री शिंदेंनी दिली 'ही' ग्वाही

Deepak Kulkarni

Mumbai : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा आरक्षणावरुन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस होता. त्यांनी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी असतील, त्यांना कुणबी दाखले दिले जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी बुधवारी घोषणा केली होती.

त्यानंतर शिंदे-फडणवीस- पवार सरकारचा अधिकृत 'जीआर' जारी करण्यात आला आहे. सरकारच्या जीआरनंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेतील अशी आशा होती. पण त्यांनी सुधारित जीआर येत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. जरांगेच्या भूमिकेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. जे आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. ते आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं होतं. दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या काळात हे आरक्षण रद्द झालं. मविआच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. आता तेच राजकारण करत आहेत असल्याचेही शिंदे म्हणाले.

आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द...

सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दाखविलेल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून काम केले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस(Devendra Fadnavis) होते, त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयाने देखील अंतिम केले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात ते रद्द झाले असल्याचा दावा त्यांनी केला.

'जीआर'नंतर जरांगे काय म्हणाले...?

मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, असा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याची भूमिका आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट केली आहे. तसेच सरकार मराठ्यांना आरक्षण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सरकारसोबत चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाईन असेही स्पष्ट केले आहे. सुधारित जीआर आणि पाणी सोबतच आणा असं खडसावून सांगितलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT