Navi Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध मंत्री गणेश नाईक असा सामना ठाणे जिल्ह्यात होत आहे. नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केलेल्या 14 गावांच्या निर्णयावरून नाईक हे शिंदेंना टार्गेट केले. नाव न घेता कोणाच्या तरी लहरीसाठी ही गावे नवी मुंबई पालिकेत समाविष्ट केल्याचे नाईक यांनी म्हणत शिंदेंवर निशाणा साधला होता. तसेच या गावांना पालिकेतून बाहेर काढणार असे जाहीर केले. शिंदे मुख्यमंत्री असताना कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला होता.
'कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तथा नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ठ झालेली 14 गावे निवडणुकी नंतर महापालिकेतून वगळण्यात येतील.', असे वक्तव्य मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा केले. त्यांच्या या वक्तव्याने 14 गावातील ग्रामस्थ मात्र नाराज झाल्याचे पहायला मिळत असून आपल्या समाजाचेच नेते अशी भूमिका घेत असतील तर काय म्हणावे, असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी त्यांच्या विधानाचा निषेध करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा ठाम निर्धार केला आहे. यामुळे आगामी पालिका निवडणुकीत 14 गावात भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना, 14 गावचे ग्रामस्थ असा कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळेल.
ग्रामस्थांनी भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे कौतुक केले आहे. त्यांनी गावांच्या समावेशाचे समर्थन केले होते. मंत्री नाईक म्हणजे भाजपा नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला पाठिंबा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा आमचा ठाम निर्धार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
प्रभाग रचनेत गावांचा समावेश
लोकसभा निवडणुकीआधी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला. 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेशाचा जीआर निघाला असला तरी अद्याप गावांची दप्तर महानगरपालिकेत जमा करण्यात आलेली नाहीत. निवडणुका जवळ आलेल्या असल्या तरी दप्तर जमा केलेली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण होते. महापालिका निवडणुकीत नवी मुंबई महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर करताना 14 गावांचा देखील समावेश केला. यामुळे ग्रामस्थांना तसेच 14 गावं विकास समितीला आपले घोडे अखेर गंगेत न्हाले असेच वाटतं होते.
14 गाव समितीचे पदाधिकारी असलेले जीवन वालीलकर माध्यमांशी बोलताना म्हटले की, त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतोय, एक समाजाचा नेता म्हणून आमच्यासाठी खूप खेदजनक दुःखदायक गोष्ट आहे. आमच्या समाजाच्या नेत्याने आपल्याच समाजाच्या लोकांची विकास काम थांबविण्याचे काम केले आहे. याबद्दल सर्वात आधी त्यांचे अभिनंदन करतो. जे काम आमच्यासाठी मंत्री एकनाथ शिंदेनी केलं आहे ते आमच्यासाठी खूप मोठं आहे. आमच्या गावांच्या कामांना चालना देण्याचे काम नेहमी शिंदेनी केले आहे. भविष्यात हि 14 गाव एकनाथ शिंदेंसोबत राहणार असल्याचे वालीलकर यांनी सांगितले आहे. तर आमदार मंदा म्हात्रे यांचे आम्ही अभिनंदन करतोय, कि एक सामाजिक भान ठेवून आपल्या समाजातील लोकांचा विकास होतो हि बाब लक्षात घेऊन त्यांनी स्वतः भाजपात असून सुद्धा गणेश नाईक म्हणजे भाजपा नाही हि भूमिका घेतलेली आहे. 14 गावांना पाठिंबा दिला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय असेही वालीलकर यांनी म्हटले आहे.
ग्रामस्थ सुखदेव पाटील म्हणाले, 14 गावांमध्ये आपला समाज असून सुद्धा मंत्री नाईक त्यांना का मागे ढकलत आहेत हे समजत नाही. निवडणुकीमध्ये 14 गावांमध्ये शिंदे यांची सत्ता येईल याची भीती त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते ही राजनीती करत असावे. त्यांच्या या विधानामुळे 14 गावातील ग्रामस्थ मात्र नाराज आहेत हे मी सांगू इच्छितो, तसेच ग्रामस्थ विजय पाटील म्हणाले, 14 गावांविषयी चा जीआर निघून दीड वर्ष झालं. मंत्री नाईकांनीही त्याला हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र गेल्या एका वर्षात असं काय झालं की 14 गावांना एवढा ते विरोध दर्शवीत आहेत. नक्की त्यांचा द्वेष हा कोणासाठी आहे?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.