Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray: 'हे सरकार सगळंच विकतंय, अन्नदात्यांनी त्यांची ताकद दाखवावी'; ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Ganesh Thombare

Mumbai News: हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकांचे पीक कर्ज फेडण्यासाठी आपले किडनी डोळे, लिव्हर असे अवयव विक्रीला काढले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपले अवयव खरेदी करण्याची विनंतीही या शेतकऱ्यांनी केली होती. यानंतर शुक्रवारी या शेतकऱ्यांनी मुंबईत जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, आता ठाकरेंनी पंचनाम्याचा खेळ थांबवा आणि सरसकट कर्जमाफी द्या, अशी मोठी मागणी करत अवयव विक्रीचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"विमा कपन्यांच्या डोक्यावर सरकारने 8 हजार कोटी घातले आहेत. विमा कंपन्यांची कार्यालये आता बंद आहेत, मग पैसा नेमका कुठे गेला, 1 रुपयांत पीकविमा देणार होते, त्याचं काय झालं ? सरसकट नुकसानभरपाई द्या, अन्यथा कर्जमुक्ती द्या, आम्ही ते करून दाखवलं होतं," असंही ठाकरे म्हणाले.

"आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली होती. आम्ही केलेली मदत यांना झाली नाही. प्रधानमंत्री फसल योजना हा एक घोटाळा आहे. ही रक्कम कोणाच्या खिशात गेली ? आता अन्नदात्यांनी त्यांची ताकद दाखवावी, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे, पण अवयव विक्रीचा विचार करू नका, हे सरकार सगळंच विकतंय, पण मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे," असेही ठाकरे म्हणाले.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT