Chhagan Bhujbal & Uddhav Thackeray Latest News
Chhagan Bhujbal & Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते आता मुख्यमंत्री झाले असते...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा 'अमृत महोत्सव' सोहळा देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. हा सोहळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे.

दरम्यान, या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. याबरोबरच भुजबळ यांच्या संघषाचही कौतूक केलं. तसेच भुजबळ आज शिवसेनेत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघीडी सरकार आपण यशस्वीपणे चालवून दाखवलं यामुळे पोटात गुब्बारा येणं स्वाभाविक आहे. त्यानंतर सरकार पाडून जे सुरू आहे. ते अजितदादांनी आणि थोरात साहेबांनी सांगितलच आहे. तेव्हा त्या सभागृहाची उंचीच वेगळी होती. मी स्वत: केशवराव धोंडगेंच भाषण एक-दोनदा गॅलरीत येऊन पाहिलं आहे. शिवसेनेची पहिली पोटनिवडणुक झाली तेव्हा वामनराव महाडिक त्यानंतर भुजबळ साहेब देखील एकमेव आमदार होते. त्यावेळी त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शिवसेना प्रमुखांना फोन करून सांगितले. एकच माणूस पाठवला पण तो बोलायला उभा राहिला की सर्व सभागृह स्तब्ध होऊन जात. हल्ली बघतोय मी कोण काय बोलतो काय बोलायचं कशाचा कशाला संबध नसतो. पुन्हा काय बोललं की हक्कभंगाचा प्रस्ताव जायचा आमच्या झिरवाळ साहेबांकडे त्यामुळे त्यावर मी काही बोलत नाही, असे म्हणतं त्यांनी भाजपला टोला लगावला.

ते पुढे म्हणाले की, सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा राजकारणाने विचार करणं हे गरजेच आहे. मला पाहिजे सर्व पाहिजे आणि प्रतिस्पर्धी कुणी शिल्लकच उरला नाही पाहिजे. भुजबळ यांच एक चांगल उदाहरण आहे. त्यांचा राजकीय जन्म हा शिवसेनेत झाला. मात्र त्यांना त्यानंतर आयुष्यात काय करायचं होतं ते त्यांनी केलचं. तसेच त्यांनी जर शिवसेना सोडली नसती तर ते आता मुख्यमंत्री झाले असते, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

याबरोबरच ते म्हणाले की जेव्हा भुजबळ बेळगावला ज्या प्रकारे गेले ते बघितल्यावर आता माझ्यावर तर आरोपच होईल की त्यांच्या पंच्चाहत्तरीच्या कार्यक्रमाला गेले त्यांनी हिदूत्व सोडलं, असा आरोपच केला जाईल, असा टोमणा देखील त्यांनी भाजपला लगावला.

आता अजितदादा म्हणाले, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोर्टात जावे लागते. अरे हिंमत्त असेल तर मैदानात याना तुम्ही, मी तर मैदानात उतरलो आहे,असे खुले आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिले. फारुक अब्दूल्ला साहेब आल्याआल्या मला भेटले आणि मला म्हणाले की, वडिलांसारख लढ. ही लढाई काय आपण सोडणार नाही. आणि सिब्बल साहेबांनी भुजबळांचा वादळ म्हणून उल्लेख केला. मात्र शिवसेने अनेक वादळ बघितली मात्र वादळ अनेक सोबतही होती. आणि न डगमगता उभे राहणारी वादळ आजही आमच्या सोबत असल्याचं त्यांनी पवारांकडे बघून सांगितले. असे असल्यामुळे मी लढाईचीच वाट बघतो. आज खुप आनंद वाटतो की, बाळासाहेबांचे जुने साथीदार आज आमच्या सोबत आहेत. ते जातांना एकटे गेले आणि येतांना पुर्ण राष्ट्रवादी आणि कॅाग्रेसलाही घेऊन आले, असे मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली आणि सभागृहात एकच हश्या पिकला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT