Raj Thackeray, Sharad Pawar, Jitendra Awhad
Raj Thackeray, Sharad Pawar, Jitendra Awhad 
मुंबई

पवारांचे नाव घेतले की चर्चा होतेच..हे डोक्यात ठेवूनच काही जण भाषण करतात, राज यांना टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना महाराष्ट्रात जातीयवाद हवा आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. त्यामधून समाजात फूट पाडली जात आहे, असा घाणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात केला. (Jitendra Awhad criticism on Raj Thackeray)

राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाचा समाचार राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी घेतला आहे. आव्हाडांनी टि्वट करुन राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ''प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,'' असा टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

''जातीपातीचे राजकारण आपण कधी बंद करणार आहेत, झेंडा पाहून घ्या एकदा ..विषय संपला..नीळा, भगवा, हिरवा,'' असा प्रश्न आव्हाडांनी ठाकरेंना टि्वट करुन विचारला आहे. ''महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा,'' अशा शब्दात आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे.

''प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,'' असे आव्हाडांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आव्हाड म्हणाले, ''राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले.माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की,त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे.दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात, मुंब्र्याला बदनाम करू नका,''

''कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात 67% हिंदू आहेत आणि 33% मुसलमान त्यात मी 75000 मतांनी विजयी झालो कळव्यातून 30000 ची आघाडी आणि मुंब्र्यातून 45000 मतांची आघाडी लोक कामावर मत देतात जाती पाती वर नाही ....18 तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहचावे लागते,'' असे आव्हाड यांनी टि्वट केलं आहे.

''राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म १९९९ मध्ये झाला, तेव्हापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. पूर्वी जात होती. पण ती अभिमानाची गोष्ट होती. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. समाजामध्ये फूट पाडली जाते. इतिहास वाचायचा नाही. इतिहास लिहिला कोणी तर बाबासाहेब पुरंदरे यांनी. तर मग तो चुकीचा आहे; कारण पुरंदरे हे सॉफ्ट टार्गेट आहेत,'' असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काल म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT