Maharashtra Political Crises
Maharashtra Political Crises Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Crises: सत्तासंघर्षाच्या लढाईत मतदारांचा हस्तक्षेप; कपिल सिब्बल बाजू मांडणार

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्षावर आज (१४ मार्च) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाचा युक्तिवाद करणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाच्या युक्तिवादाला सुरुवात झाली होती. मात्र शिंदेंच्या वकिलांकडून आणखी वेळ मागितल्याने आज त्यांचा युक्तिवाद पार पडणार आहे.

दरम्यान, ॲड. असीम सरोदे यांनी काल (१३ मार्च) ॲड. देवदत्त कामत तसेच जेष्ठ विधीज्ञ ॲड. कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा करून त्यांना मतदारांच्या तर्फे खालील मुद्दे दिलेत. कपिल सिब्बल यातील काही मुद्दे प्रत्यक्ष त्यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान मांडणार आहेत. याबाबत ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले आहे.

ॲड.असीम सरोदे न्यायालयात दाखल केलेल्या लेखी युक्तिवादात म्हणतात -

1. पक्षांतर बंदी कायद्याच्या इतिहास ही भारतातील पहिली घटना आहे की,न्यायालयाने थर्ड पार्टी याचिका म्हणून मतदारांतर्फे दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिका दाखल करून घेतली.

2. 'मतदार' जे लोकशाहीची चाके सक्रिय करतात त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो.

3. सहज पद्धतीने पक्षांतर होऊ नये यासाठी पक्षातरबंदी कायदा आहे असा साधारणतः सगळ्यांचा समज आहे.

5. कोणतेच संविधान स्वतःचे रक्षण करू शकत नाही पण त्यासाठी आवश्यक राजकीय संस्कृती निर्माण करू शकते. मतदारांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित होतात परंतु आमदार म्हणून कायदे तयार करण्याची जबाबदारी असलेल्यांचे संविधान प्रबोधन कोण करणार?

6. संविधानिक संस्कृती तयार करण्याची प्रक्रियाच राजकीय लोकांनी कठीण व दुरापास्त करून टाकलेली आहे.

7. महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे नागरिकांना आता कळायला लागले आहे की, 10 व्या परिशिष्टात पक्षविरोधी कारवाया करण्याला ' स्वतःच्या वागणुकीतून पक्ष सोडला' असे म्हणता येते. पळून गेलेले आमदारांचे वर्तन मतदार बघत आहेत.

8. दहाव्या परिशिष्टाच्या परिच्छेद 4(2) चा कायदेशीर अर्थ एकाच वेळी 2/3 लोकांनी मूळ पक्ष सोडणे असा आहे व जेव्हा काही जण सुरतला जातात, नंतर काही जण तेथे जाऊन मिळतात, काही जण गुवाहाटीला जातात असे एकेक करून एकत्र येणे म्हणजे एकाच वेळी 2/3 लोक पक्षातून बाहेर जाणे नाही व त्यामुळे सुद्धा त्यांना कोणतेच कायद्याचे संरक्षण नाही हे मतदारांना दिसते.

9. माननीय न्यायालय आता या प्रकरणाचेच नाही तर 'लोकशाहीचे अंपायर' आहे. पक्षांतर करण्यामागच्या प्रेरणा व उद्देश बघणे त्यासाठी महत्वाचे आहे.

7. महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे नागरिकांना आता कळायला लागले आहे की, 10 व्या परिशिष्टात पक्षविरोधी कारवाया करण्याला ' स्वतःच्या वागणुकीतून पक्ष सोडला' असे म्हणता येते. पळून गेलेले आमदारांचे वर्तन मतदार बघत आहेत.

8. दहाव्या परिशिष्टाच्या परिच्छेद 4(2) चा कायदेशीर अर्थ एकाच वेळी 2/3 लोकांनी मूळ पक्ष सोडणे असा आहे व जेव्हा काही जण सुरतला जातात, नंतर काही जण तेथे जाऊन मिळतात, काही जण गुवाहाटीला जातात असे एकेक करून एकत्र येणे म्हणजे एकाच वेळी 2/3 लोक पक्षातून बाहेर जाणे नाही व त्यामुळे सुद्धा त्यांना कोणतेच कायद्याचे संरक्षण नाही हे मतदारांना दिसते.

9. माननीय न्यायालय आता या प्रकरणाचेच नाही तर 'लोकशाहीचे अंपायर' आहे. पक्षांतर करण्यामागच्या प्रेरणा व उद्देश बघणे त्यासाठी महत्वाचे आहे.

10. व्यक्तिगत महत्वाकांक्षा व स्वार्थ यासाठी राजकीय लोक त्यांच्या निष्ठा बदलतात त्यामागे फार आयडियालॉजी (विचार व तत्वज्ञान) नसते. अशा पक्षांतरातून लोकशाहीची विश्वासहार्यता पणाला लागलेली आहे. पक्षांतर करणाऱ्यांना त्याबदल्यात मिळणारे बक्षीस सामान्य मतदारांच्या कल्पना करण्याचे पलीकडचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT