Uddhav Thackeray News :  Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : उत्तर मुंबईत मोठा ट्विस्ट; ठाकरेंच्या उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर लढणार?

Chetan Zadpe

Mumbai News : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. उत्तर मुंबईमध्ये काँग्रेस आता उमेदवार आयात करणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. फेसबुक लाईव्हमध्ये गोळीबारात मृत्युमुखी पडलेले अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वीनी घोसाळकर यांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची असे वृत्त साम टीव्ही या वाहिनेने दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

याबाबत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाच्या संभाव्य आणि चर्चेतल्या उमेदवार होत्या. त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल, अशी चर्चा होती. मात्र आता ठाकरेंच्या उमेदवार काँग्रेस आयात करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे मोठा चेहरा नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा संभाव्य उमेदवारालाच आपल्याकडे आयात करण्याचा काँग्रेसची रणनीती आहे. याच अनुषंगाने ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे नते यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे.

कोण आहेत तेजस्विनी घोसाळकर?

शिवसेनचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपुर्वी एका फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या झाडून हत्या झाली होती. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर आहेत. तेजस्वीनी यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे.

पियुष गोयल यांच्याशी सामना -

ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्विनी घोसाळकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर भाजपचे दिग्गज उमेदवार पियुष गोयल यांच्याशी त्यांचा सामाना होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे नेते याबाबत पुन्हा एकदा चर्चा करुन निर्णय घेण्याची शक्यता आहे.

वर्षा गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्षा वर्षा गायकवाड या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) झालेल्या जागावाटपावरून नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा होती. विशेषत: जागावाटपामध्ये मुंबई शहरात काँग्रेसवर अन्याय झाल्याची भावना मुंबई काँग्रेसमध्ये असल्याचे बोलले जात होते. मुंबई शहरातील लोकसभेच्या सहापैकी एकच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याने गायकवाड नाराज असल्याची चर्चा होती. यातूनच त्यांनी आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसला उत्तर मुंबईची जागा मिळण्याची शक्यता पुढे आली आहे.

दिल्लीतील हायकमांडच्या भेटीनंतर वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, "मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणवर चर्चा झाली. संघटनेचे प्रमुख पदाधिकारी म्हणून काँग्रेस अध्यक्षांना भेटलो. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते, भावना अध्यक्षांना कळवल्या आहेत. पक्षाचे, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत या संदर्भात चर्चा झाली. पक्षाध्यक्षांना मुंबई, महाराष्ट्र माहिती आहे. आम्ही त्यांना आमच्या भावना कळवल्या आहेत, ते योग्य निर्णय घेतील. मुंबईतील सर्व सहाच्या सहा जागा आम्ही जिंकू असा विश्वास आहे, असे म्हणत मुंबईतील नाराजी बद्दल थेट बोलणं त्यांनी टाळलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT