Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : नाराज आमदारांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय ; शिंदे गटाच्या प्रत्येक मंत्र्यांवर..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. याबाबतचे पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच घेतलेल्या आमदारांच्या बैठकीत उमटले.

आपलेच मंत्री आम्हाला सहकार्य करीत नसल्याची भावना या आमदारांनी बैठकीत व्यक्त केली होती. मंत्र्यांना बैठकीच्या बाहेर ठेवून आमचं म्हणणं ऐकूण घ्यावे, अशी मागणी आमदारांनी केली होती. आमदारांच्या या मागणीमुळे अडचण निर्माण होईल, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी मान्य केली नाही.

महाविकास आघाडीच्या काळात निधी मिळत नसल्याची तक्रार शिंदे गटातील आमदारांची होती. भाजपसोबत सत्तेत आल्यावर अधिकचा निधी मिळेल, असे सांगण्यात आले होते, पण तसे झाले नाही, असा आमचा वर्षभराचा अनुभव आहे, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांकडून आमची कामे होत नाही, अशी तक्रार या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या या तक्राराची दखल घेऊन आता शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यावर पाच आमदारांची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. शिंदे यांनी काढलेल्या तोडग्यावर सध्यातरी आमदारांचे समाधान झाल्याचे दिसते.

या पाच आमदारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी होईल हे पाहाणे आणि आवश्यकता असेल तिथे ती बाब आपल्या लक्षात आणून देणे ही जबाबदारी या मंत्र्यांना पार पाडावी लागणार आहे. या आमदारांना पुन्हा निवडून कसे आणायचे हे पाहाण्याचीही जबाबदारी या मंत्र्यांवर असेल.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT