Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar In Opposition Meeting : राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि ठाकरेही बोलले; पण पवारसाहेब बोललेच नाहीत...

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : सत्ताधारी भाजपविरोधात उघडलेल्या मोहिमेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे प्रमुख चेहरा असतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जाहीर केले. विरोधी ऐक्याच्या बेंगळूरूतील बैठकीला पवार उपस्थित राहिले. बैठक आटोपातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषणे करून आपल्या भूमिका मांडल्या. ही मंडळी बोलली; तरी पवार काय बोलणार याकडे देशभराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र, पवार काहीच बोलले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना शह देऊन सत्ता बदलण्याच्या इराद्याने सर्व विरोधकांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे. त्यासाठी हेवेदावे विसरुन विरोदक एकत्र आले आहेत . पहिल्या टप्प्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पुढाकाराने पाटण्यात बैठकीत घेतली होती. आता दुसरी बैठक बेंगळूरुत पार पडली. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

या बैठकीत विरोधकांनी आपल्या गटाचे नाव ठरवले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी INDIA (इंडिया) या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्यास सर्व पक्षांनी अनुमोदन दिले. तर आगामी लोकसभा निवडणुका संयुक्त पुरोगामी आघाडी ऐवजी 'इंडिया' या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीचे वादळ उठले असतानाही पवार बैठकीला उपस्थित राहिले. बैठक संपताच प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडल्या. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बोलले. त्यानंतर शरद पवार बोलतील असं वाटत असतानाच अचानक काँग्रेस नेते राहुल गांधी बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, शरद पवार का बोलले नाहीत असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ शकतो.

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले ?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधकांच्या बैठकीत भाजपवर निशाणा साधला. देशाची लोकशाही आणि संविधान संपवायचं आहे. ते केंद्रीय तपास यंत्रणांचा यासाठी वापर करत आहेत. विरोधकांना दाबण्यासाठी ते ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करत आहेत, अशी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

आपल्यासाठी देश हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. आपल्याला देशाला कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न लकरणं हेच आमचं ध्येय आहे. विरोधकांच्या बैठकीची पुढची बैठक ही मुंबईत होईल असं खर्गे यांनी जाहीर केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT