Manoj Jarange Maratha Morcha :  Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Maratha Morcha : शिष्टमंडळासोबत बैठक संपली; थोड्याच वेळात जरांगे भूमिका स्पष्ट करणार...

Chetan Zadpe

Mumbai News : अंतरवाली सराटीहून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठीचा महाविराट मोर्चा आता मुंबईजवळच्या वाशीमध्ये मुक्कामासाठी थांबला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली असून, आता ही चर्चा संपली आहे. त्यामुळे यावर काही तोडगा निघतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या सरकारच्या शिष्टंमडळाची चर्चा आता संपली आहे. या बैठकीत काय ठरलं? समाधान झाले का? तोडगा निघाला का? याबाबत मनोज जरांगे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मनोज जरांगे आणि सरकारचे शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सूत्रांची माहिती आहे. मागील अनेक वर्षांपासून सुरु असेलल्या मराठा आरक्षण प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आता जरांगेच्या भूमिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT