Manoj Jarange Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Speech : मराठा आरक्षणाबाबत मोठा फैसला; काय म्हणाले जरांगे पाटील ?

Ganesh Thombare

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमधून लाखो मराठा बांधवांसह पदयात्रा सुरू केलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत. मुंबईत पोहोचेपर्यंत जरांगे पाटील यांच्या ठिकठिकाणी भव्य सभा पार पडल्या. यानंतर अखेर लाखो मराठा बांधवांसह ते नवी मुंबईत दाखल झाले.

मात्र, मुंबईत पोहोचण्याआधीच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटील यांच्याशी यशस्वी चर्चा केली आहे. राज्य सरकारचा 'जीआर' वाशीमधील भर सभेत दुपारी वाचून दाखला. सरकारच्या 'जीआर'मध्ये नेमकं आहे ? याची उत्सुकता मराठा बांधवांना लागली होती. (Manoj Jarange Speech on Maratha Reservation )

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?

"आत्तापर्यंत राज्यात 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. ते प्रमाणपत्र द्या. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीला लावा. तसेच शिबीरे घ्या आणि प्रमाणपत्र घ्या. ज्या नोंदी मिळाल्या आहेत, त्याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांना देखील प्रमाणपत्र देण्यात यावे."

"54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र वितरीत करा. आत्तापर्यंत 37 लाख प्रमाणपत्र वितरीत केले असल्याची माहीती सरकारने दिली आहे", अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच ज्यांना प्रमाणपत्र देण्यात आले, त्यांचा डाटा सरकारने द्यावा, असंही ते म्हणाले.

शिंदे समिती मुदत वाढवली.

'शिंदे समिती रद्द करायची नाही. शिंदे समितीने काम करत राहायचं अशी आमची मागणी आहे. तसेच दोन वर्षासाठी शिंदे समितीची मुदत वाढवण्यात यावी. मात्र, सरकारने दोन महिन्यांची मुदत वाढवली आहे. तर त्यानंतर सरकार शिंदे समितीची मुदत वाढवणार आहे', असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

'सरकारी भरती राखीव जागा ठेवा'

'सरकारी भरती आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत. जर सरकारी भरती सरकारला करायची असेल तर मराठा समाजाला राखीव जागा ठेवायच्या', अशी आपली मागणी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

'मोफत शिक्षण द्या...'

'मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश

अंतरवाली सराटी आणि राज्यातील मराठा आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्याचे गृहविभागाचे आदेश देण्यात आले असल्याची माहीती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

राज्य सरकारला पुन्हा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जवळपास पूर्ण केल्या आहेत. पण शासन निर्णय आणि अध्यादेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे जो पर्यंत अध्यादेश देण्यात येत नाही, तो पर्यंत मी मागे हटणार नाही. आज रात्री अध्यादेश देण्यात यावा, अन्यथा उद्या मी आझाद मैदानावर आम्ही येणार आहोत, असा इशारा जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT