Manoj Jarange Speech on Maratha Reservation : सगेसोयऱ्यांबाबत आज रात्रीतच अध्यादेश काढा, अन्यथा...; जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

Manoj Jarange : नवी मुंबईत मराठा समाजाच्या ताकदीचा महिमा मनोज जरांगेंनी सांगितला
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation March Update : अंतरवाली सराटीतून मराठ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने निघाले आणि सरकारने आरक्षणासाठी हालचाली वाढवल्या. यामुळे तीन लाखांच्या नोंदी वाढून आता 57 लाख झाल्या आहेत. तर 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचे सामन्य प्रशासनाच्या सचिवांनी सांगितले. आता सग्यासोयऱ्यांचा अद्यादेश आज रात्रीच काढवा. उद्या सकाळीपर्यंत अध्यादेश आला नाही तर आझाद मैदानावर जाणार. तसेच आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरायचे नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

नवी मुंबईत बोलताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, 'आजच्या बैठकीला मंत्रिमंडळातील एकही मंत्री नव्हते. मात्र सामान्य प्रशासन विभागाचे सचिवांशी चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी राज्यात एकूण 57 लाख नोंदी आढळल्याची माहिती दिली. तर आतापर्यंत 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आपल्या मागण्यांसाठी मोर्चा निघाल्यानंतर तीन लाख नोंदी वाढल्याचे दिसत आहे. तसेच प्रमाणपत्र वाटपासाठी गावागावत शिबिरे घेण्यात आली आहेत. या बाबी सरकारने यापूर्वी करायला हव्या होत्या. मिळालेल्या नोंदींच्या आधारे सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे. अंतरवाली सराटीसह राज्यभरातील गुन्हे मागे घ्यावेत,' या मागण्यांवरही जरांगेंनी ठाम असल्याचे सांगितले.

Manoj Jarange
Manoj Jarange Speech : मराठा आरक्षणाबाबत मोठा फैसला; काय म्हणाले जरांगे पाटील ?

राज्यात सापडलेल्या नोंदींबाबत (Maratha Reservation) जरांगे म्हणाले, '54 लाख नोंदी सापडल्या असतील तर त्यांना प्रमाणपत्र वाटप करावे. नोंदी नेमक्या कुणाच्या आहेत, हे माहिती करायचे असेल तर ग्रामपंचायतीला कागदपत्रे द्यावी लागतील. काही जणांनी अर्ज केलेले नाहीत. आता नोंदी मिळाल्याचे माहिती होण्यासाठी गावागावत शिबिरे घ्यावीत. त्या नोंदी ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात करावी. ज्या नोंदी मिळालेल्या लोकांच्या सर्व कुटुंबाला त्याच नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे. त्यासाठी शपथपत्र घ्यावे, त्याची खातरजमा करवी. शपथपत्रासाठी स्टँपपेपर मोफत देण्यासही सरकार तयार आहे,' अशीही माहिती जरांगेंनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोफत शिक्षण अन् भरतीबाबत मागणी

'राज्यात मिळालेल्या नोंदीप्रमाणे नातेवाईकांची वंशावळ जोडावी लागणार आहे. त्यासाठी समिती गठीत करून नोंदी करण्यासाठी वेळ लागणार आहे. नातेवाईकांना शपथपत्र घेऊनच प्रमाणपत्र द्या. त्यामुळे आता संबंधितांना 100 टक्के प्रमाणपत्र मिळणार आहे. यासाठी मात्र त्या परिवाराने अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज केला नाहीतर प्रमाणपत्र मिळणार नाही. गावागावात नोंद मिळाली असेल, तर त्यांनीही अर्ज करावेत. त्यांना चार दिवसात प्रमाणपत्र मिळेल. तसेच मराठा समाजाच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्यात यावे. तसेच नोकर भरती करायची असेल तर सरकारने मराठ्यांच्या जागा राखीव ठेवण्यात याव्यात,' अशी मागणीही जरांगेंनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange
Rahul Gandhi : आधी दोस्ती, नंतर दुश्मनी; राहुल गांधींचं 'या' बड्या नेत्याबरोबर नेमकं कुठं बिनसलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com