Manoj Jarange On Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : "मुंबई मराठी माणसांची, फडणवीसांनी शब्दाला जागावं; कबुतरांसाठी आंदोलनला परवानगी देता मग मराठ्यांना का नाही?"

Sanjay Raut on Maratha Reservation Protest : मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या जुन्याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ते अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेत.

Jagdish Patil

Mumbai News, 28 Aug : मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या जुन्याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ते अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेत.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना केवळ एक दिवस ते ही अटी शर्तींसह आंदोलनसाठी परवानगी दिली आहे. यावरून जरांगेंनी हा राज्य सरकारचा डाव असून मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत ते परवानगी देऊ शकतात. मात्र, त्यांनी जाणूनबुजून एक दिवसाची परवानगी दिल्याची टीका केली.

याच पार्श्वभूमीवरून आता विरोधकांनी फडणवीस सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, "मुंबईत कबुतरांसाठी होणाऱ्या आंदोलनाला जर सरकार परवानगी देते तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी," असं म्हटलं आहे.

मराठा आंदोलनावर बोलताना राऊत म्हणाले, "मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत. यापूर्वी महायुती सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे. विधानसभेपूर्वी देखील त्यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या.

जर मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकतं आणि त्याला सरकार परवानगी देत असेल तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

त्यामुळे फडणवीसांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधावा. विरोधक या विषयावर राजकारण करत नाहीत. मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते असून त्यांच्या मागे समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्या काही मागण्या आहेत तर ते सरकारकडे मागणी करणार. कारण देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल तर ते त्यांच्या मागण्या दुसऱ्या मुख्यमंत्र्याकडे घेऊन जातील. ते व्यक्तीकडे नव्हे तर तुम्ही पालक आहात म्हणून त्यांच्या मागण्या घेऊन ते लोक मुंबईकडे आले आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल," असंही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT