Anil Deshmukh
Anil Deshmukh 
मुंबई

ED समोर न येणाऱ्या अनिल देशमुखांविरोधात आता न्यायालयानंही काढलं समन्स

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ED) अनेकदा नोटीस बजावूनही राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हजर झालेले नाहीत. याविरोधात ईडीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळं आता न्यायालयानं देशमुख यांना समन्स बजावलं आहे. त्यांना 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेही मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू केली. देशमुख यांच्या चौकशीसाठी ईडीकडून आतापर्यंत देशमुख यांना पाच समन्स बजावण्यात आले आहेत. पण देशमुख एकदाही चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झालेले नाहीत.

ईडीने पाठवलेलं एक समन्स खुद्द देशमुख यांनी स्वीकारलं होतं. तर इतर समन्स कुटूंबीय व वकिलांनी स्वीकारली आहेत. पण ते एकादाही जर न झाल्याने न्यायालयानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ईडीनं केली आहे. या मागणीवर मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी देशमुख यांना समन्स बजावले आहे. देशमुख यांनीही उच्च न्यायालयात ईडीच्या समन्सविरोधात याचिका दाखल केली आहे.

मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांना समन्स

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) आणि पोलिस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. याची चैाकशी सीबीआयकडून सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून पांडे व कुंटे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते. मात्र, सीबीआयकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला.

ईडीकडून देखील याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्या तपासाचा एक भाग म्हणून आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते. सीबीआयने यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयकडून कुंटे आणि पांडे यांना समन्स बजावले जाणार आहेत. यामध्ये दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे जायचे, याबाबतची सविस्तर माहिती असेल.

परमबीर सिंग रशिलाला पळून गेले आहेत का? वळसे पाटलांनी दिलं उत्तर

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे नक्की कोणत्या कारणास्तव दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा केली होती. आता दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआय कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. मात्र सीबीआय कार्यालयात जाण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT