Avinash Jadhav MNS  sarkarnama
मुंबई

MNS Avinash Jadhav : निवडणूक अधिकाऱ्यांचे सेटींग? अवघ्या 24 तासांची मुदत, अविनाश जाधव प्रचंड आक्रमक; आता आयुक्त टार्गेट!

Thane Election Officer  Avinash Jadhav : महिला निवडणूक अधिकाऱ्याने सेटींग करत मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद केल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला होता. या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाईसाठी ते आक्रमक झाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane News : ठाणे पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज छाननी प्रक्रियेच्या वेळी मनसेसह विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव करत आहे. या प्रकरणी त्यांनी निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली. मात्र, आता या प्रश्नावर जाधव प्रचंड आक्रमक झाले आहेत.

'सरकारी अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार घडला आहे. संबंधित महिला निवडणूक अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करू, असा इशाराही जाधव यांनी दिला. तसेच कारवाईसाठी 24 तासांची मुदत देखील दिली आहे.

ठाणे पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले. त्यात मनसेच्या एका महिला उमेदवाराचा अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केल्याने संतप झालेल्या मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केला. ठाण्यातील निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी उमेदवारी अर्जांच्या तपासणीदरम्यान गंभीर घोळ केला. फॉर्म आणि कागदपत्रांबाबत चुकीची प्रक्रिया अंमलबजावणीमुळे अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाले, आरोप करण्यात आला.

मनसेने या प्रकरणाची तक्रार राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली. मंगळवारी ठाणे पालिका आयुक्त आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. यावेळी पालिका आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, पुढील २४ तासांत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. चौकशी करून त्याच कालावधीत नवीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

ज्या महिला अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की हे प्रकरण इथेच थांबेल, त्यांचा गैरसमज आहे. आम्ही माहिती अधिकाराचा वापर करून त्यांच्या मालमत्तेपासून प्रत्येक गोष्टीची चौकशी करू. त्यांच्या निर्णयांमुळे अनेक तरुण उमेदवारांचे राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचा आरोपही जाधव यांनी केला.

कारवाई होणार

प्रभाग क्रमांक 5 मध्येही असाच प्रकार घडल्याचा आरोप करत जाधव यांनी सांगितले की, तिथेही चुकीच्या पद्धतीने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांचा अर्ज बळजबरीने सूचक आणि अनुमोदकाला घेऊन बाद करण्यात आल्याचा आरोप करत, त्या प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या दोन्ही प्रकरणांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं जाधव यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT