Nana Patole Vs Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Nana Patole Vs Devendra Fadnavis : अनिल देशमुखांच्या आरोपांवरून पटोलेंनी फडणवीसांच्या 'वर्मा'वर बोट ठेवलं!

Pradeep Pendhare

Mumbai News : भाजप नेते गृह तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालय. या दोघांच्या आरोपांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्मावर बोटं ठेवलं.

देवेंद्र फडणवीस गेली साडेसात वर्षे गृहमंत्री राहिले आहेत. त्यांना गृहमंत्री पदावर केलेल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्यात दम असेल, तर देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, असे आव्हान पटोले यांनी फडणवीस यांना दिले.

नाना पटोले मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपांवर टिप्पणी केली. देवेंद्र फडणवीस मागे का हटत आहेत, त्यांच्याकडे पुरावे असतील, असे ते दोन दिवसांपूर्वी बोलत होते. ऑडिओ आणि व्हिडिओ असल्याचे सांगत आहेत. मग राज्यात चुकीचे कृत्य करणाऱ्यांची ऑडिओ आणि व्हिडिओ लपवून ठेवण्याचे कारण काय? दम असेल, तर कारवाई करा. अनिल देशमुख यांची चूक असेल, तर कारवाई करा, असे नाना पटोले यांनी म्हणत फडणवीस यांना आव्हान दिले.

अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येताच, त्यावेळीच सांगितले होते की, माझ्यावर दबाव होता की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र करून द्या. यानंतर आम्ही तुम्हाला सोडतो. त्याचवेळेस देवेंद्र फडणवीस बोलले नाही. सत्तेचा अधिकार वापरून विरोधकांना धमकावण्याचे पाप देवेंद्र फडणवीस करताना संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर दबावतंत्र आणि धमकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हे संशायप्द असल्याचा आरोप नाना पटोले यांनी करत फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.

जनतेला खरं हवं आहे

अनिल देशमुख त्यांच्यावर असलेल्या दबावतंत्रावरून सातत्याने सत्ताधाऱ्यांविरोधात आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांनी आज फोटोसह प्रसारमाध्यमांना प्रेस घेऊन सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दम असेल, तर यातील वास्तविकता महाराष्ट्रापुढे मांडावी. कारण ते त्या खुर्चीत बसले आहेत. तसे पाहिले गेल्यास गेली साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहे. त्यांचाकडे कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी वास्तविकता महाराष्ट्राच्या जनेतसमोर मांडली पाहिजे. अनिल देशमुख यांचे आरोप खरे आहे की, खोटे हे महाराष्ट्रातील जनतेला समजण्याचा अधिकार आहे, त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुतता समोर ठेवावी, असे नाना पटोले यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT