Mumbai News, 04 Feb : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder) अत्यंत क्रुरपद्धतीने केली याबाबतची माहिती गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप केला.
तसंच या प्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणू असा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले (Nana patole) यांनी दिला आहे. नाना पटोले म्हणाले, "सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली याबाबतची माहिती गृहखात्याकडे नव्हती का? मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली.
शिवाय मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता त्यांनी थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे या प्रकरणी फडणवीसांवर उद्या सभागृहात हक्कभंग आणू."
तसंच यावेळी त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप देखील फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला. ते म्हणाले; "नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व जनतेची दिशाभूल केली.
सरपंच देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड व त्याचे सहकारी आरोपी आहेत. पण सरकारने या प्रकरणातील माहिती लपवल्याने त्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे, अशी मागणी सभागृहात करणार असल्याचंही पटाले यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.