Eknath Shinde News  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : विकासकामांना स्थगिती देऊन सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? जयंत पाटलांचा सवाल

Mangesh Mahale

राहुल गडकर

Sangli : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पडल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने केलेल्या मंजूर कामांना स्थगिती दिली. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा युती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे.

"महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय व इतर सर्व विकासकामांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. यामध्ये अगदी गावाच्या छोट्या पाणंद रस्त्यापासून ते राज्य महामार्ग, शासकीय इमारती अशा शेकडो प्रकारच्या महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश होता," असे टि्वट जयंत पाटलांनी केले आहे.

...तर स्थगिती कधीच उठवली नसती

उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या याचिकांमध्ये निर्णय देताना राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. याबद्दल उच्च न्यायालयासमोर उर्वरित प्रलंबित याचिकांमध्ये राज्य सरकारने स्वतःहून सर्व स्थगिती सरसकट उठवली आहे. आम्ही न्यायालयात गेलो नसतो, तर राज्य सरकारनेही स्थगिती कधीच उठवली नसती. राज्य सरकारने स्थगिती उठवलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करतील, अशी आशा करतो, असे जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास आहे...

"लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत आलो, असा कांगावा करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. सत्तेत आल्यानंतर सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती देऊन शिंदे फडणवीस सरकार नक्की कोणाची प्रगती करणार होते? महाविकास आघाडीसाठी मात्र महाराष्ट्राचा विकास हाच ध्यास होता आणि आहे," असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT