Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : नागपुरात असूनही अजितदादांची अधिवेशनाकडे पाठ; 'नॉट रिचेबल' राहण्याचा 'एजन्सी'चा सल्ला? चर्चांना उधाण

Chhagan Bhujbal Expresses Frustration over Cabinet Exclusion : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपणाला मंत्रीपद न मिळाल्याची खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 18 Dec : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपणाला मंत्रीपद न मिळाल्याची खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. शिवाय नाराजी व्यक्त करताना त्यांनी खुद्द पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा आहे. एकीकडे छगन भुजबळ मंत्रीपद मिळालं नाही म्हणून आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे भुजबळ ज्यांच्यावर आरोप करत आहेत ते पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र सध्या नॉट रिचेबल आहेत.

नागपुरात असूनही अजित पवार (Ajit Pawar) अधिवेशनात फिरकले नाहीत. तर अजित पवार हे मंत्रिमंडळात कमी वाटा मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, अजितदादांच्या नाराजीचे खरे कारण हे छगन भुजबळांची नाराजी आणि त्यांनी केलेली वक्तव्य आहेत. शिवाय सध्या अजितदादा बाहेर आले तर त्यांना माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागू शकते.

त्यामुळे अशा परिस्थितीत कोणाशी काही बोलण्यापेक्षा आणि प्रतिक्रिया देण्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य असल्याचा सल्ला त्यांना देण्यात आल्याचं सांगितल जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून अजित पवारांच्या 'इमेज बिल्डिंग'साठी काम करणाऱ्या कंपनीने त्यांना या काळात नॉट रिचेबल राहण्याचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे.

तर भुजबळांनी केलेल्या वक्तव्यांवर आणि टीकेवर अजित पवार लवकरच उत्तर देतील, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिली जात आहे. तर दुसरीकडे घश्याच्या संसर्गामुळे अजित पवार अधिवेशात आले नसल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

कसला वादा, अन् कसला दादा

दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) येवल्यात पत्रकार परिषद घेत मनातील खदखत बाहेर काढली. यावेळी त्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना प्रफुल पटेल, सुनील तटकरेंनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असं सांगितलं.

मकरंद पाटीलांना मंत्रिपद देण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू-पंजू आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्रिपदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT