Laxman Hake on Maratha quota Sarkarnama
मुंबई

Laxman Hake on Manoj Jarange : 'कोणीतरी चिंधीचोर उठतो अन् बेकायदा मागणी करतो, 50 टक्के ओबीसी एकवटला तर काय होईल?' लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर जोरदार प्रहार

OBC Laxman Hake Criticizes Manoj Jarange Maratha Quota Protest in Mumbai : मुंबई इथं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे.

Pradeep Pendhare

Laxman Hake statement Maratha reservation : ओबीसीमधूनच मराठा आरक्षण घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांसह मुंबईत धडकले आहे. जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांवर घणाघात केला आहे. 'कोणीतरी चिंधीचोर उठतो अन् बेकायदा मागणी करतो, 50 टक्के ओबीसी एकवटला तर काय होईल?,' असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.

लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मुंबईतील आंदोलनावर म्हणाले, "हा आरक्षणाचा लढा नाही आहे. मराठ्यांच्या शिक्षण, नोकऱ्यांसाठी कळवळ दाखवली जात आहे, हे तसंही नाही. मुंबईकडे निघताना जरांगेंनी स्क्रिप्ट फोडली. राजकीय अजेंडा असल्याची ही स्क्रिप्ट आहे. हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी, विरोधी पक्षांचे आमदार-खासदार सामील आहेत, तसेच सत्ताधारी अजित पवार यांचे आमदार सहभागी आहेत."

"जरांगे नावाच्या चेहऱ्या आडून, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आरक्षण हा विषय नाही. मराठा बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. जरांगेंची ही मागणी मान्य झाल्यास, महाराष्ट्रातील ओबीसीचं (OBC) आरक्षण संपलेले असेल. ओबीसींची आरक्षण सरकार, राज्यकर्ते यांच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी आहे. ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे, तेच सगळे लांडगे ओबीसींच्या कळपामध्ये घुसले तर, मेंढरांचं काय होईल?,' असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी केला.

'आमदार-खासदार, शरदचंद्र पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते, नांदेडचा खासदार आहे, रवींद्र चव्हाणांनी लेटर हेडवर पाठिंबा दिला आहे, जरांगे पाटलांना. ओबीसींच्या आरक्षणाविषयी मग भूमिका जाहीर करा. ओबीसींचे आरक्षण तुम्हाला संपवायचं आहे का? तुमच्या स्पर्धेत ओबीसी टिकेल का? बेकायदा मागणी, बेकायदा उपोषण, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, कायद्यासमोर सर्व समान, लक्ष्मण हाके गेवराईला गेला तर, नोटीस, 'एफआयआर', जरांगेंना मात्र रेड कार्पेट! खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल करताना, सामाजिक दुजाभाव इथं महाराष्ट्रात होत आहे,' असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला.

सत्ताधारी अजित पवार यांचे आमदार कशाला मदत करतील, यावर लक्ष्मण हाके म्हणाले, "हाच प्रश्न विजयसिंह पंडित आणि रमेश सोळंकी यांना विचारावा. जरांगे इथपर्यंत येण्यासाठी कुणी 'रसद' पुरवली. जाहिररीत्या पुरवली. प्रेस घेऊन सांगितलं आहे. मी फक्त राष्ट्रवादीचं बोलत नाही. बंडू जाधव, रवींद्र चव्हाण, बजरंग सोनवणे यांचं देखील नाव घेत आहे. 'रसद' एवढ्यासाठी पुरवली जाते आहे की, 'ओबीसी'चं आरक्षण संपवणे हे सर्वपक्षीय आमदारांची आहे. अजितदादांचे आमदार यात जाहिररित्या आहेत."

"पाच-दहा टक्के लोकं एखाद्या झुंडीद्वारे मुंबईला येत असतील, आम्ही तर 50 टक्के आहोत गावगाड्यात आहे. आम्ही राज्यकर्ते जमात आहोत. हा 50 टक्के ओबीसी जमा झाल्यास काय होईल तुमचं. निश्चित याची मला जाणीव आहे. ओबीसीमधील सर्व जमातींना एकत्र करणं अवघड म्हणून तुम्ही त्यांचे आरक्षण संपवायला चाललाय, आम्ही बोलायला लागलो की, आम्हाला व्हाईस नाही. झुंडीने येऊन बेकायदा मागणी केली जात आहे. बेकायदा मागणी करणाऱ्यांना माझं सांगण आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच सांगितल आहे की, आम्ही 10 टक्के 'एससीबीसी'चं आरक्षण दिलं आहे. 'ओबीसीं'चा कट आॅफ पेक्षा 'एससीबीसी'चा कट आॅफ कमी असताना, त्यांना 'ओबीसी'मधून का आरक्षण हवं आहे. म्हणजे 'ओबीसीं'चं आरक्षण संपवणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे,' असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT