Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : 'मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे महाविकास-आघाडी तोडून भाजपसोबत जाणार होते?' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा...

Chetan Zadpe

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर महाविकास आघाडी सरकार तोडून भाजपसोबत जाण्यास तयार होते, असा दावा तटकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असतानाच ठाकरे भाजपसोबत जाणार होते, या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पत्रकार परिषदेत संवाद साधताना तटकरे म्हणाले, "उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. ठाकरेंना त्यावेळी भाजपसोबत जाण्याची वेळ होती, त्याची कारणे ते स्वत: सांगू शकतील किंवा चाळीस वर्षे ते म्हणतात त्याप्रमाणे सामनामधील संपादकीय लिहित असलेले संजय राऊत त्याबद्दल सांगू शकतील. पण ही बाब खरी आहे, वस्तुस्थिती आहे."

दरम्यान, सुनील तटकरे यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर ठाकरे गटाची काही प्रतिक्रिया आली नसली, तरी यावरून ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि ठाकरे गटाचे यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. या विधानावर ठाकरे गट नेमकी कशी प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT