Rahul Narwekar, Eknath Shhinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यरो

Mumbai : ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चार दिवसातच उत्तर द्यावे लागणार आहे. यावर संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार असल्याचे नार्वेकरांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. (Latest Political News)

विधानसभा अध्यक्षांकडे सर्व अधिकार असतानाही शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिकेनुसार कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. यानतंर न्यायालयाने अध्यक्षांकडे ३१ जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुदत दिल्याची माहिती विधीमंडळ विश्वसनीय सूत्रांनी दिली. यावर नार्वेकरांनी संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करावे अशी याचिका ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा विषय विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येत असल्याचे सागूंन त्यांनी विहित वेळेत निर्णय द्यावा अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली होती. असे असतानाही नार्वेकरांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. याबाबत ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

यावर निर्णय देण्यासाठी नार्वेकरांना ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे नार्वेकरांना लवकरच शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय द्यावा लागणार आहे. आता चार दिवसात राज्याच्या राजकाणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT