Sharad Pawar NCP Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Live Speech : चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांनी थोपटले दंड

सरकारनामा ब्यूरो

NCP News : आजची बैठक ही ऐतिसाहीक बैठक आहे. सपूर्ण देशात चर्चा आहे, २४ वर्षा पूर्वी सगळ्यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी लाखोंची सभा केली होती. पक्षाची स्थापना होऊन २४ वर्ष झाले. तेव्हापासून नेतृत्वाची फळी उभी करण्यासाठी काम केले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थित पक्षाचा मेळावा झाला. त्यावेळी शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह जाऊ देणार नाही. मात्र, मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढलो आहे. त्यामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळी चिन्ह होती. त्यामध्ये मी जिंकलो आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाणे महत्वाचे आहे, असे पवार यांनी सांगितले.

पक्षामध्ये आजपर्यंत कुणी आमदार झाले, खासदार झाले. अनेकांना मंत्रिमंडळ मिळाली. अनेक नेते तयार केले. मनात एकच भाव होते या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. तुमच्या कष्टाने आपण यशस्वी झालो. संकट खुप आहेत. ती संकट ज्याची वैचारीक भूमिका देशाच्या हीताची नाही, अशांच्या हातामध्ये देशाची सूत्र आहेत. ज्याच्या हातामध्ये सूत्र आहे, त्यांच्या सहकार्यांना सुद्दा काम करण्याची मर्यादा आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपावर (BJP) केला.

मी केंद्र सरकारमध्ये अनेकदा काम केले. या सगळ्यांची कामची पद्धत बघितली. एखादी गोष्टा योग्य नसेल तर त्या गोष्टीवर मार्ग काढणे, लोकांमध्ये जाऊन चर्चा करायची असते. आज ते सगळे बदले आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांचा सुसंवाद पाहिजे. मी महाराष्ट्राचा चार वेळा मुख्यमंत्री होतो. त्या निर्णयाच्या संबंधी सामान्य माणसामध्ये संवाद ठेवावा लागतो. जे अयोग्य असते ते दुरुस्त करावे लागते, असे पवार म्हणाले.

आम्ही सगळे जण सत्ताधारी पक्षात नाही आहोत. पण आम्ही लोकांमध्ये आहोत. राज्य करत्यांचा आणि सहकाऱ्यांचा संवाद नाही. देशातील जनतेमध्ये एक प्रकारची अस्वस्थाता आहे. आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले आहे, की लोकशाही टीकवायची असले तर एकत्र आले पाहिजे. आम्ही सगळ्यांना संघटीत करण्यासाठी सुरुवात केली.

देशाच्या पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात एक भाषण केले. त्यांनी सांगितले काँग्रेस (Congress) पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी काही विधान केली. या पंतप्रधानांचे एख वैशिष्य आहे, ते एकदा बारामतीला आले आणि त्यांनी सांगितले देश आणि प्रशानस कसे चालवायचे हे मी शरद पवारांकडून शिकलो. त्यानंतर निवडणुकीत आले तेव्हा प्रचंड शिविगाळ केली, असेही पवार यांनी सांगितले.

भ्रष्टाचार केला असले तर कारवाई केली पाहिजे. जणमाणसाच्या पुढे बोलतो, त्यावेळी काही मर्यादा पाळल्या पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस चांगला नसेल तर मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत का घेतले, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी बाजूला जाण्याची भुमिका घेतली. माझी काही हरकत नाही. मात्र, दु:ख आहे. काल नाशिकला पक्षाच्या ऑफिसमध्ये काही लोकांनी ताबा घेतला. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? उद्या उठेल आणि मी राष्ट्रवादी आहे, असे सांगेतल, ते योग्य नाही, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT