Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या निकालाची कुणकुण लागली? म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : खरी शिवसेना कुणाची याच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पूर्ण झाली आहे. या सुनावणीसंदर्भात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. राजकीय पक्ष फक्त निवडून आलेल्या व्यक्तींवर अवलंबून नसतो. निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर पक्ष म्हणून मान्यता मागितली तर कोणीही उद्योगपती आमदार, खासदार विकत घेतील आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला.

निवडणूक आयोगात प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून निवडणूक आयोग कधीही निकाल देऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. निवडणूक आयोगात ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनीही सर्वोच्च न्यायालयाचा (Central Election Commission) निर्णय जो पर्यंत येत नाही, तो पर्यंत आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी केली होती.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

मी दुसरी शिवसेना (Shiv Sena) मानतच नाही.

शिवसेनेच्या घटनेत शिवसेनाप्रमुख व शिवसेनापक्षप्रमुख हीच दोनच पद आहेत. मुख्य नेता हे पद घटनाबाह्य, असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

निवडून आलेले लोकच म्हणजेच पक्ष हा शिंदे गटाचा दाव हास्यास्पद, असल्याचा आरोप त्यांनी केला.

गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणे हा नीचपणा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी आयोगाचा निर्णय नको. सर्वोच्च न्यायालयाने लवकर निर्णय घ्यावा. आमदार अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, तो खटला आधी सुरु झाला आहे.

आमदार अपात्र होणार असतील, तर त्यांचा दावा ग्राह्य कसा असा सवला त्यांनी केला.

पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही.

पैशाच्या बळावर उद्या उद्योगपतीही पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होतील.

यासहन अनेक मुद्यांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. तसेच खासदार अनिल देसाई यांनीही यावेळी भूमिका मांडली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाआधी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे आयोगात काय निकाल लागणार याची कुणकुण उद्धव ठाकरे यांना लागली आहे का? असा सवाल विचारला जात आहे. निवडणूक आयोगातील खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कधीही निकाल देऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT