Sanjay Raut 5 Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : 'मुंबईतील गुन्हेगारीचं सूत्रसंचालन गुजरातमधून..'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.

"हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतली असेल, तर हा मुख्य आरोपी गुजरात जेलमध्ये आहे. गुजरात 'ATS'च्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे", असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येशी निगडीत आणि मुंबईतील वाढत्या गुन्हेगारीवरून गंभीर मुद्दे उपस्थित केले आहे. 'गुजरात 'ATS'च्या ताब्यात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा हत्येची जबाबदारी घेत आहे, हे खूपच गंभीर आहे. म्हणजेच, एकप्रकारे मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे. सर्व काही गुजरात मधून होत आहे. मुंबईतून पैसा पळवायचा, मुंबईतून उद्योग पळवायचा, मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, मुंबईतील माणसांची हत्या कारायच्या, हे सर्व सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

मुंबईतील राजकीय नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये, खरं म्हणजे अमित शाहांचा (Amit Shah) राजीनामा मागावा, असे हे प्रकरण आहे. गुजरातमधील गँगस्टर महाराष्ट्राच्या नेत्याची हत्या करतो, काय प्रकरण आहे? असा सवाल करत संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.

अजितदादांवर निशाणा

'बाबा सिद्दिकी यांची हत्या हे साध प्रकरण नाही. या राज्याचे माजी मंत्री होते. अनेक वर्ष आमदार होते. नगरसेवक होते. अजितदादा येथील सिंघम आहेत, इथं एक फुल दोन हाफ सिंघम आहेत, त्यांच्या एका सहकाऱ्याची हत्या झाली, त्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे होता. फक्त निषेध व्यक्त करणे हे राजकारणात गांडूगिरीचे लक्षण आहे. सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे. कधी कुठून गोळी चालेल, कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील, मुंबई आणि पुण्यात याचा भरोसा नाही', अशी भीती देखील संजय राऊत यांनी व्यक्त केली.

गुंडांच्या टोळ्या पोसल्यात...

या सर्व गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजकारणासाठी करत आहेत. एकनाथ शिंदेंनी गुंडांच्या टोळ्या पोसलेल्या आहेत पोलिस ठाण्यामध्ये आणि बाहेर लोकसभा निवडणुकीत त्यांचा वापर झाला आणि विधानसभेत देखील होईल, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT