Ramdas Kadam, Eknath Shidne, Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "उद्धव ठाकरे आतल्या गाठीचा माणूस"; शिंदेंच्या नेत्याची टीका राऊतांच्या जिव्हारी म्हणाले, मिंधे गटाच्या पाच पंचवीस टाळक्यांना...

Mumbai Thackeray Brothers Rally : ठाकरे बंधुंनी हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात रान उठवल्यानंतर महायुती सरकारने अखेर हिंदी भाषे संदर्भातील अध्यादेश मागे घेतला. सरकारचा हा निर्णय म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे, असं सांगत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून 5 जुलै रोजी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 04 Jul : ठाकरे बंधुंनी हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात रान उठवल्यानंतर महायुती सरकारने अखेर हिंदी भाषे संदर्भातील अध्यादेश मागे घेतला. सरकारचा हा निर्णय म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे, असं सांगत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून 5 जुलै रोजी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार आहेत. मात्र, यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राज ठाकरेंना सल्ला देत उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस दाखवायचा चेहरा वेगळा आहे. राज साहेबांना विनंती आहे, जरा जपून पुढचा विचार करा, उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले.

ते फक्त तुम्हाला वापरून घेतील, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, मग तुमचे कसे होणार? असा सवाल करत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर ते पुन्हा काँग्रेसकडे जातील,असं कदम यांनी म्हटलं. त्यांच्या याच वक्तव्यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, "रामदार कदम हे शिवसेनेचे आमचे जुने सहकारी आहेत. ते सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आहे आणि त्या भयातून अशी वक्तव्य येत आहेत. रामदास कदम काय बोलतायत, शिंदे काय बोलतायत, हे सुरूच राहणार. कारण मराठी माणूस जर एकत्र आला आहे. पोटाचा भीती गोळा आल्यानं मिंधेंच्या पाच पंचवीस टाळक्यांना ठाकरे बंधु एकत्र आलेलं नको आहे.

मिंधे गटाचे राजकीय भविष्यात नष्ट होत आहे. त्यामुळे भीतीपोटी त्यांना अशा कल्पना सूचत आहेत. तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह, फडणवीस आणि बावनकुळे, गिरीश महाजन यांची चिंता करा. तुम्हाला लोकांची बूट चाटायची आहेत. तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका."

दरम्यान, राऊतांनी उद्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला ऐतिहासिक दिवस असेल असा दावा केला. मराठी माणसाच्या जीवनातला ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे. मराठी विजय दिवस म्हणून आहे. पण महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडवणारा दिवस आहे. उद्या वरळीतल्या सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्रित येतील.

लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना व मनसे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्रित तयारी करत आहेत. आज सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत. उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल. उद्या आपण पाहाल काय ठरलं आहे आणि काय ठरवलं आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT