Uday Samant On Ratnagiri Refinery News :  Sarkarnama
मुंबई

Uday Samant PC News : आमदार-खासदारांची तिकिटं कापली का? मंत्री उदय सामंत म्हणाले...

Chetan Zadpe

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेत तिकीट-उमेदवारीच्या दाव्यावरून आताच वाद-विवाद घडून येत आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. अनेक विद्यमान खासदार - आमदार यांचे तिकिटं नाकारली जाणार, असाही मुद्दा समोर येत होता. यातच शिवसेनेतील दोन ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यात तर जाहीरपणे वाद घडून आला आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत चाललंय काय? असे विचारले जात होते. यावर आता राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत, सगळं काही ठीक असल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, "शिवसेनेची तिकिटं कुणाला द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. महायुती अतिशय मजबूत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांची कशी धूळधाण झालेली आहे, हे आपण पाहिलं. काही खासदारांची तिकिटं बदलावी अशा बातम्या येत आहेत. कोणाला तिकीट द्यायचं हे एकनाथ शिंदे ठरवतील, आमच्या पक्षाचा अधिकार कोणालाही दिला नाही. भाजप आणि राष्ट्रवादीशी आमचा चांगला समन्वय आहे, युती भक्कम आहे."

गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यातल्या वादावर सामंत म्हणाले, "गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम हे दोन्ही नेते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी स्वत: सांगितलं आहे की, त्यांच्यातला वाद संपला आहे. आम्ही सर्व एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानतो. वादाचे असतील किंवा तिकिटाचे असतील हे सर्व निर्णय शिवसेना पक्षामध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे हेच घेतात."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT