Election Commission Sarkarnama
प्रशासन

Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र; व्यक्त केली नाराजी

Sachin Waghmare

New Delhi News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू आहे. त्याचसाठी निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. निवडणूक आयोगाचे काही केंद्रीय अधिकारी मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यानंतर त्यांची सर्व पक्षांच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या पथकाने राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी केंद्रीय पथकाने राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्रसह निवडणुका होणाऱ्या इतर चार राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत एकाच जागी तीन वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण निवडणूक आयोगाच्या पत्राकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने आयोगाने नाराजी दर्शवली आहे.

राज्य सरकारला या साठी कालावधी देण्यात आला होता. मात्र, दिलेल्या कालावधीत या सगळ्याची माहिती का दिली नाही ? हे स्पष्ट करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलही उत्तर न आल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र आले असल्याने त्यामुळे आता राज्य सरकारकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT