Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Pune News: कळमोडी धरणातील पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण; आढळराव पाटलांनी दिलं मोठं आश्वासन

Shivajirao Adhalrao Patil: शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली.

डी.के.वळसे पाटील

मंचर : मुंबई येथे आझाद मैदानावर कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह (ता.आंबेगाव) शिरूर व खेड कोरडवाहू गावांना मिळावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (ता.२६) पासून शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

या उपोषणाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (ता.२७) भेट दिली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आढळराव पाटील म्हणाले, "कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरातील शेतीला मिळावे. हा प्रश्न तातडीने सुटावा, यासाठी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे ", असं ते म्हणाले.

"खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळावी यासाठी, डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी उपोषण सुरु आहे", असं पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन यावेळी आढळराव पाटील यांनी दिलं.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT