Mumbai News: बॅालिवुड अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्लाचा तपास मुंबई पोलिस करीत आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. हल्लामागील कारणे काय आहेत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, आणि सलमान खान याच्या घरावरील हल्ला यांचा संबध या हलल्याशी नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्था रामभरोसे असल्याचे चित्र सध्या आहे.
बीडमध्ये नुकत्याच झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्यावरील हल्याला महिन्या पूर्ण झाला आहे. अशातच पुन्हा बांद्रामध्ये सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री एका चोरानं चाकूनं हल्ला केला. सैफची प्रकृती सध्या स्थिर आहे. पण गेल्या काही महिन्यात राज्यात सुरु असलेल्या गुन्हेगारी विश्वातील या घटनामुळे प्रशासन, पोलिस यंत्रणांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात काय सुरु आहे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. राज्यातील कायद्या, सुव्यवस्थेबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. सैफच्या हल्ल्याशी बिष्णोई टोळीशी संबध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अॅगलने सध्या तपास सुरु आहे. सैफ यांच्या घरात चोर शिरला कसा, याचा तपास पोलिस करीत आहे. चोराला घरातील कुणी मदत केली, याचा तपास सुरु आहे.
सैफवरील हल्ल्यानंतर अनेक तर्क-विर्तक लावले जात आहेत. राजस्थानमध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं आणि त्या दरम्यान सलमान खानने दोन काळविटांची शिकार केली. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध असताना सलमानने हे कृत्य केल्याने तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. यावेळी सैफही सलमानसोबत होता, त्यामुळे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगने हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.
काळविट शिकार प्रकरणी लॉरेन्स बिष्णोई गँग मात्र सलामान खानवर प्रचंड नाराज आहे. 1998 पासून त्यांच्यात वैर सुरु आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्याही यामुळे झाली असल्याचे बोलले जाते. कारण बाबा सिद्दीकी हे सलमान खान याचे निकटवर्तीय होते.
मुंबईत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर बेछूट गोळीबार झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्या. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.घोसाळकर यांच्या हत्येनंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, यामुळे राजकीय वर्तुळात भीतीचं वातावरण आहे. अशातच सैफवर हा हल्ला झाल्याने मुंबईत सेलिब्रिटींच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.