Ashadhi Wari News  Sarkarnama
पुणे

Rohit Pawar on Lathicharge in Alandi : शिंदे सरकारनं वारकऱ्यांवर लाठीहल्ल्याचे पाप केलयं ; पवारांचा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीवर..

सरकारनामा ब्यूरो

Alandi Ashadhi Wari News : श्रीक्षेत्र आळंदी येथून रविवारी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान ठेवले. यंदाच्या वारी सोहळ्याला गालबोट लागले आहे. वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांची फेसबूक पोस्टवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. पवारांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीवर टीका केली आहे.

"अशी घटना विरोधी पक्षाचं सरकार असताना घडली असती तर भाजपने आणि त्यांच्या कथित अध्यात्मिक आघाडीने तांडव केलं असतं. शिवाय केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? हाही प्रश्न आहेच." असे म्हणत रोहित पवारांनी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीवर निशाणा साधला.

"भक्तपरंपरेचा हा सोहळा राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सरकारने बोगस वारकऱ्यांना आधी दूर ठेवण्याची गरज आहे. नियोजनाच्या नावाखाली मंदिरामध्ये सामान्य वारकऱ्यांना येऊ दिल जात नसल्याचं आज मीही पाहिलं, त्याचं राजकारण करायचं नाही, पण आता हे अति होतंय. शिवाय लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? हे कथित हिंदुत्त्ववादी राज्य सरकारने सांगावं.." असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात..

आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्यावेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वारीच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली. राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येणारे काही बोगस वारकरी या सोहळ्यात घुसल्याने खऱ्या वारकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचं पाप या सरकारने केलं.

भक्तपरंपरेचा हा सोहळा राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सरकारने बोगस वारकऱ्यांना आधी दूर ठेवण्याची गरज आहे. नियोजनाच्या नावाखाली मंदिरामध्ये सामान्य वारकऱ्यांना येऊ दिल जात नसल्याचं आज मीही पाहिलं, त्याचं राजकारण करायचं नाही, पण आता हे अति होतंय. शिवाय लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? हे कथित हिंदुत्त्ववादी राज्य सरकारने सांगावं.. अशी घटना विरोधी पक्षाचं सरकार असताना घडली असती तर भाजपने आणि त्यांच्या कथित अध्यात्मिक आघाडीने तांडव केलं असतं. शिवाय केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? हाही प्रश्न आहेच.

नेमक काय झालं.

माउलींच्या पालखीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान ठेवताना मोठ्या संख्येने वारकरी, भाविक मंदिरात दाखल झाले होते. गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून केवळ मानाच्या दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येईल असे सर्वानुमते ठरले होते. मात्र ऐनवेळी इतरही वारकऱ्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र वारकरी आग्रही होते. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांनी लाठीमार केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लाठीमार झाला नसून फक्त वारकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला, असा दावा केला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT