Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Jayant Patil ED Notice : जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या लोकांकडून सत्ताधाऱ्यांची काही अपेक्षा असेल; पण...

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil ED Enquiry News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने समन्य पाठवले होते. त्यानुसार पाटील आज (ता. 22) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. पाटील यांच्या चौकशी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले.

पवार पुण्यामध्ये बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, तपास यंत्रणांचा गौरवापर कसा केला जातो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आमच्याकडे जी यादी आहे, त्या प्रमाणे राष्ट्रवादीच्या 10 लोकांना ईडीने समन्स पाठवले. अनिल देशमुख यांना 13 महिने तुरुंगात ठेवले. त्यांनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केला, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर तो आरोप 1 ते दिड कोटी पर्यंत आला. मात्र, त्या प्रकरणात सुद्धा काहीही सापडले नाही.

राष्ट्रवादीच्या आठ दहा लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. काही अपेक्षा राष्ट्रवादीच्या लोकांकडून सत्ताधाऱ्यांची असेल, त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची आम्हा लोकांची तयारी नाही. असेल ती किंमत देऊ, पण आमचा रस्ता आम्ही सोडणार नाही. हे त्यांना पसंत पडत नसेल त्यामुळे त्रास देण्याचा प्रयत्न होतो, असे पवार म्हणाले.

परमबीर सिंगांवर किती केसेस आहेत, याची माहिती राज्य सरकारने घ्यावी, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये किती तक्रारी झाल्या, चुकीचे काम करणाऱ्यांना सरक्षण देण्याचे काम सुरु आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिकांना त्रास दिला गेला. ते जी भूमिका माध्यमांच्या समोर मांडत होते, त्या बद्दल त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे. मलिक यांनी जे सत्य मांडले होते, त्याची दखल सीबीआयने घेतली आहे. त्यामुळे मलिक यांची भूमिका सत्यावर आधारीत होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.

या वेळी रिझर्व बॅंकेच्या 2000 हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही पवार यांनी भाष्य केले. पवार म्हणाले, एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावे, तसे निर्णय घेतले जात आहेत. नोटबंदी केली तेव्हा पुणे जिल्हा बॅंकेकडे कॅश होती, ती बदलून देण्याची जबाबदारी असतानाही ती बदलून दिली गेली नाही. त्यामध्ये बॅंकेत मोठे नुकसान झाले. सुरुवातीच्या काळामध्ये सांगण्यात आले की, नोटा आज पासून बंद, तेव्हा सांगितले की देशात चमत्कार होईल, मात्र, अनेक लोकांचे व्यवसाय संपले बुडाले, त्यांचे नुकसान झाले. तेव्हा लोकांची अडचण झाली, अशा शब्दांत पवार यांनी केंद्र सरकारवर निशणा साधला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT