Sharad Pawar
Sharad Pawar  sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवारांकडून महत्वाची सूचना

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाबाबत राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री, आमदार यांच्याकडून टीका करण्यात आली. तसेच दादोजी कोंडदेव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वारंवर टीका होत आहे. अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketki Chitale) राज्यभर दाखल झालेले गुन्हे, समाज माध्यमावर होणारी टीका यावरून ब्राह्मण समाजात नाराजी आहे. (Sharad Pawar latest news)

यासंदर्भात ब्राह्मण संघटनांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी संवाद साधण्यासाठी निसर्ग मंगल कार्यालय येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलविली होती. या बैठकीला ब्राह्मण संघटनांचे सुमारे 60 प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना महत्वाची सूचना दिली. सुमारे दीड तास शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, "माझ्या पक्षातील सहकाऱ्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल जी काही वक्तव्ये केली होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली होती पण यावरून पक्षातील जबाबदार नेत्यांनी कोणत्याही जाती धर्माबद्दल वक्तव्ये करताना काळजी घ्या, अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. ब्राह्मण समाजाने त्यांच्या प्रगतीसाठी भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन त्यांना दिले आहे," "या बैठकीच्या माध्यमातून ब्राह्मण समाजामध्ये असलेली अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे," असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले, "आनंद दवे यांनी बैठकीसाठी वेळ मागितला होता. पण तेच आज आले नाहीत. पण महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील प्रतिनिधींना भेटायचे होते.

अवस्थता होती, माझ्या सहकाऱ्यांनी जी विधाने केली त्याची अवस्थता होती. पुन्हा या पद्धतीने जाती व धर्माबद्दल बोलू नये, अशा सूचना दिल्या आहेत,"

"ग्रामीण भागातून शहरी भागात ब्राह्मण समाज येत आहेत. सेवा क्षेत्रात त्यांना संधी आहे. त्यांना आरक्षण हवे आहे, पण लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत ब्राह्मण समाजाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आरक्षण देता येणार नाही. यावर ब्राह्मण समाजाला व्यवसायाला मदत करण्यासाठी महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी केली. पण हे माझ्या हातात नाही, राज्य सरकारच्या संबंधित आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून वेळ घेऊन बैठक घेतली जाईल," असे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. "याची तारीख दीड महिन्यात कळविण्यात येईल. राज्यातील वातावरण खराब झाले असे वाटत नाही. पण जबाबदार लोकांनी जाती धर्माबद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे," असे पवार म्हणाले.

ब्राह्मण समाजाकडूनच मला भेटण्यासंदर्भात विनंती

"ब्राह्मण समाजाच्या वास्तूसाठी बाबत मी बैठक आयोजित केलेली नव्हती ब्राह्मण समाजा कडूनच मला भेटण्यासंदर्भात विनंती करण्यात आल्याने ही बैठक घेण्यात आली. कोणत्याही समाजाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली असता ती दिली गेली पाहिजे," असे पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT