Sushma Andhare, Rahul Narwekar Sarkarnama
पुणे

Sushma Andhare : निकालाबाबत सुषमा अंधारे यांचं धक्कादायक वक्तव्य

Chaitanya Machale

Pune Politicle News :

शिवसेनेत (ShivSena) फूट पाडून वेगळा गट स्थापन करणारे आणि मुख्यमंत्री होणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत थोड्याच वेळात निकाल येणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) सायंकाळी साडेचार वाजता हा निकाल देणार आहेत. अनेक महिन्यांपासून हा विषय सुरू असल्याने अध्यक्ष नार्वेकर काय निकाल देणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या निकालावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात दाखल झालेल्या सुषमा अंधारे आज (बुधवारी) पुण्यात होत्या. निकालाबाबत त्या म्हणाल्या, या निकालाबाबत माझ्या मनात शून्य उत्सुकता आहे.

सुप्रीम कोर्टाने विधानसभाध्यक्षांना याबाबत निर्देश दिल्यानंतरदेखील 13 ते 14 महिन्यांनंतर हा निकाल लागत आहे. त्यामुळे याची फारशी उत्सुकता राहिलेली नाही. वेळकाढूपणा करत हा निकाल टोलवत आणण्याचे काम करण्यात आले आहे. हे सर्व पाहता ' उशिरा न्याय मिळणे हेदेखील अन्याय होण्यासारखे असते,' अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी नाराजी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वीच विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने यावर सर्व स्तरातून टीका सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाने याबाबत कोर्टातही धाव घेऊन विधानसभाध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे.

यावर अंधारे म्हणाल्या की, निरपेक्षपणे न्यायदानाची जबाबदारी असलेली व्यक्ती दुसऱ्या बाजूच्या एखाद्या प्रतिनिधीकडे जाऊन भेटते, याचा अर्थ काय काढायचा. जेव्हा तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी असते आणि तुम्ही त्यावर निकाल देणार असता त्याअगोदर एक ते दोन दिवस तुम्ही प्रतिस्पर्धी गटातील व्यक्तीला जाऊन भेटत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात साशंकता निर्माण होणारच.

ही साशंकता निर्माण होऊ नये, यासाठी कोणतीही काळजी विधानसभाध्यक्ष नार्वेकर घेत असल्याचे दिसत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता असताना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन बाहेर पडले. शिंदे यांनी केलेले हे बंड महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का होता. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि वारसा जपण्यासाठी आम्ही हा उठाव केला असल्याचे पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. शिंदे शिवसेनेच्या 40 आमदारांसह बाहेर पडल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT