Loksabha Election : बारामती मतदारसंघात 56.07 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान तब्बल सहा टक्के कमी आहे. त्यामुळे या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू झाली. मात्र, मतदानाच्या Voting टक्केवारीवरून इंदापुरचे माजी आमदार, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
हर्षवर्धन पाटील Harshvardhan patil म्हणाले, काहींचे मत आहे की टक्केवारी कमी झाल्यावर कुणाचातरी फायदा होतो. पण एकंदरीत मला असे वाटते की सुनेत्रा पवार या निश्चितपणाने निवडून येतील. मतदानाच्या कमी टक्केवारीचा सुनेत्रा पवारांच्या विजयावर काहीच परिणाम होणार नसल्याचे सांगत पाटील यांनी सुनेत्रा पवारच sunetra pawar विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या अस्मितेवर मतदान होत असलेल्या दाव्यावर हर्षवर्धन पाटील म्हणाले, कुठल्याही निवडणुका या कोणाच्या अस्मितेच्या नसतात.निवडणूक अस्मितेची असती तर मतदानाचा टक्का 75 ते 80 टक्के व्हायला पाहिजे होता, असे देखील हर्षवर्धन पाटील म्हणाले.
बारामती मतदारसंघामध्ये 56.07 टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये सर्वात कमी मतदान पुरंदर तालुक्यात 48 टक्के झाले आहे. तर, बारामती तालुक्यात सर्वाधिक 64.50 टक्के मतदान झाले आहे. बारामती पाठोपाठ इंदापूर तालुक्यात 62.50 टक्के मतदान झाले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.