Politics : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ; कुशवाहांनी जेडीयूचा राजीनामा देत केली नव्या पक्षाची घोषणा

Bihar Politics : नितीश कुमारांना मोठा धक्का
Bihar Politics News
Bihar Politics News Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics News : बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. जनता दल युनायटेडचे (जेडीयू) संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी नितीश कुमारांची तिसऱ्यांदा साथ सोडली आहे. त्यामुळे नितीश कुमारांना मोठा धक्का बसला आहे.

उपेंद्र कुशवाहांनी जेडीयूचा राजीनामा दिला असून नितीश कुमार यांच्यापासून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय़ घेतला आहे. कुशवाहांनी राष्ट्रीय लोक जनता दल या नवीन पक्षाची स्थापना केली आहे. ते आता या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत.

Bihar Politics News
Uddhav Thackeray News: निवडणूक आयोगावर केस केली जाईल : उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. तर गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या बैठकीनंतर उपेंद्र कुशवाहांनी हा निर्णय घेतला. कुशवाहांनी जेडीयूच्या संसदीय मंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी काही घडामोडीबाबत भाष्य केलं.

कुशवाहा यांनी पाटणा येथे पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी ते म्हणाले, ''नितीश कुमार यांच्याबरोबरची सुरुवात चांगली होती. मात्र, शेवट वाईट होता. पण आता एका नव्या प्रवासाला सुरूवात करत आहे. तसेच विधान परिषदेच्या अध्यक्षांची भेट घेऊन मी येत्या दोन दिवसांत आमदार पदाचा राजीनामा देणार आहे'', असं ते म्हणाले.

Bihar Politics News
Uddhav Thackeray : व्यापाऱ्यांच्या राज्यात निकाल विकत घेतला; 'सामना'तून भाजपसह निवडणूक आयोगावर टीका

''मुख्यमंत्र्यांनी आधी फार चांगले काम केले. मात्र, सध्या जेडीयूचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. सध्या नितीश कुमार हे ज्या मार्गावर चालत आहेत ते पक्षासाठी चांगले नाही.

मी पक्षामध्ये काही प्रश्न उपस्थित केले तर मला त्यांनी पक्ष सोडून जा, असं सांगितलं. नितीश कुमार यांच्याकडे काय आहे? त्यांच्याकडे काहीच राहिले नाही. त्यांनी आपल्या पक्षाला वेठीस ठेवलंय. त्यांच्या हातात झिरो उरला आहे'', असा घणाघात कुशवाहा यांनी केला.

Bihar Politics News
Ashok Chavan News : माझ्याबाबतीत घातपाताची शक्यता, मंत्रीपदाच्या काळातील लेटरहेडचाही गैरवापर..

''नितीश कुमार आधी स्वत: कोणताही निर्णय घेत असत. ते कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधायचे. मात्र, सध्या ते कोणताही निर्णय घेत नाहीत. ते मुख्यमंत्री आहेत, पण स्वत:च्या मर्जीने काहीच करत नाहीत. त्यामुळे नितीश कुमार (Nitish Kumar) चुकीच्या मार्गावर चालत आहेत'', अशी टीका यावेळी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com